• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मार्चमधील अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 19, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
235
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. धाराशिव जिल्ह्यातील ३ हजार ३१५ बाधित शेतकऱ्यांना एकूण ३ कोटी ३९ लाख ३६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी (दि. १८) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मार्च महिन्यात अवेळी झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त भागांचा सविस्तर अहवाल तयार केला होता. हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर शासनाने मदतीस मंजुरी दिली आहे. महसूल विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण १६६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

यामध्ये सर्वाधिक फटका फळपिकांना बसला होता आणि १०७५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते. तसेच ५५५ हेक्टर बागायती क्षेत्र आणि ३३ हेक्टर जिरायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. तालुकानिहाय पाहता, लोहारा तालुक्यात सर्वाधिक ५९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्याखालोखाल तुळजापूरमध्ये ४४६ हेक्टर, वाशीमध्ये २६२ हेक्टर, उमरगा येथे १६२ हेक्टर तर नळदुर्ग अप्पर तहसील अंतर्गत १९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

धाराशिव, परंडा आणि कळंब या तालुक्यांमध्ये मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झाले नव्हते. शासनाच्या निकषानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये आणि फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे.

संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत लवकरच जमा करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. प्रशासनाने दोन्ही महिन्यांचे स्वतंत्र पंचनामे करून वेगवेगळे अहवाल शासनाकडे सादर केले होते. मार्च महिन्यातील नुकसानीसाठी आता मदतीला मंजुरी मिळाल्याने बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#crores#announced#farmers-affected-unseasonal
SendShareTweet
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६२ लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त

Next Post

Breaking पीकविमा रोखण्यासाठी विमा कंपनीचा नवा डाव; ३३६ कोटींच्या दाव्यावर केंद्रीय समितीकडे अपील

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

Breaking पीकविमा रोखण्यासाठी विमा कंपनीचा नवा डाव; ३३६ कोटींच्या दाव्यावर केंद्रीय समितीकडे अपील

मनोज जरांगे-पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांसाठी दिले 'हे' आदेश

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

June 18, 2026
तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; भाविकांमध्ये समाधान

तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ‘एकच रांग’ व्यवस्था सुरू; गैरसोय टळली

June 18, 2026

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group