• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, August 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची मोठी झळ; 400 कोटींच्या अनुदानाची गरज, 189 कोटींचा पहिला प्रस्ताव शासनाकडे सादर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 18, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
522
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सज्जन यादव / आरंभ मराठी

धाराशिव –
यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यात प्रचंड थैमान घातले. लाखो हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे वाया गेले असून, ऐन काढणीस आलेल्या सोयाबीनची अक्षरशः माती झाली आहे.

तीच गोष्ट ऊस आणि इतर फळबागांची असून, शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या मदतीकडे लागले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून धाराशिव जिल्ह्याला जवळपास 400 कोटी रुपयांची शासकीय मदत हवी आहे.

त्यापैकी 189 कोटींचा पहिला प्रस्ताव कृषी आणि महसूल विभागाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून, लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात 5 लाख 72 हजार 203 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पिके घेतली जात आहेत.

यापैकी खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाची लागवड 4 लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली आहे. अतिवृष्टीचा जिल्ह्यातील संपूर्ण सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, उत्पन्नात मोठी घट होणार आहे.

जिल्ह्यातील तब्बल 40 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकत्याच झालेल्या पंचनाम्यांच्या आधारे 189 कोटी रुपयांचा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

पहिल्या प्रस्तावात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आठही तालुक्यात 2 लाख 22 हजार 975 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी 189 कोटी 60 लाख रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या आठवड्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी शक्यता आहे.

मात्र, संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा विचार करता किमान 400 कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाची आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे मत आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे 8 मंडळातील 65000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यासाठीही जवळपास 125 कोटी रुपयांची गरज आहे.

सध्या पंचनामे सुरू असून, लवकरच हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी तर शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे हंगामभराचे श्रम वाया गेले आहे.

पुढील तीन आठवडे परतीचा पाऊस धुमाकूळ घालेल असा हवामान विभागाचा अंदाज असल्यामुळे सोयाबीन काढणीच्या हंगामात देखील शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होईल अशी भीती आहे.
शासनाकडे पाठवलेला पहिला प्रस्ताव ही केवळ प्राथमिक आकडेवारी असून, उर्वरित पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अजून प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.

परंतु, शेतकरी वर्गामध्ये शासनाच्या मदतीबाबत मोठी अपेक्षा आहे. तातडीने शासकीय अनुदान मिळाले नाही, तर रब्बी हंगाम घेणे कठीण होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे अग्रीम पीक विम्याचा पर्याय देखील यंदा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. पिकांची राखरांगोळी झाली असताना देखील हजारो रुपयांचा पीक विमा भरूनही पिकांना संरक्षण मिळत नसल्यामुळे बळीराजा उद्विग्न झाला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवणे हीच आता सरकारपुढील मोठी जबाबदारी ठरणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करत असून, उध्वस्त झालेल्या बळीराजाचे डोळे मात्र मदतीकडे लागले आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#district#rainfall#farmer#farming#grant#crore#government#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदतवाढ

Next Post

पीक विम्याचा 2021 चा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात ; 374 कोटी मिळण्याची आशा धूसर

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

पीक विम्याचा 2021 चा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात ; 374 कोटी मिळण्याची आशा धूसर

तुळजाभवानी मातेच्या दरबारात होणार 'या' नवदुर्गांचा सन्मान; नवरात्र उत्सवात नऊ दिवस कार्यक्रम

ताज्या घडामोडी

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group