• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 11, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्ह्यात 363 गावांना पुराचा फटका; सर्वाधिक नुकसान परांडा तालुक्यात, जिल्ह्यात क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 25, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
251
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / प्रतिनिधी

धाराशिव : सप्टेंबर महिन्यात विशेषतः मागील चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले असून प्राथमिक आकडेवारीनुसार सव्वादोन लाख हेक्टरवरील पिके व फळबागांचा पूर्णतः नाश झाला आहे. यामध्ये तब्बल ३६३ गावे बाधित झाली आहेत. तसेच एक लाख ९८ हजार ३७५ शेतकरी या आपत्तीने होरपळून निघाले आहेत.

अतिवृष्टीमुळे एक हजार ४८ घरांची पडझड झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यासोबतच २०७ जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्राथमिक आकडेवारीनुसार २ लाख २६ हजार ७०६ हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. यात जिरायती, बागायती तसेच फळपिके यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले की, नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने युद्धपातळीवर सुरु केले आहेत. ऑगस्ट महिन्यात शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या याद्या तयार करून वाटपाची प्रक्रिया गतीने सुरु आहे. पंचनाम्यानंतर नव्याने झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मागणी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आकडेवारीनुसार दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टरवरील जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टरवरील बागायती व दोन हजार ४२५ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व पिकांचे अंदाजे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला बसला आहे. सर्वात कमी नुकसान कळंब तालुक्यात नोंदवले गेले आहे.

जनावरांचे मोठे नुकसान

अतिवृष्टीत केवळ शेतीच नव्हे तर जनावरांचाही मोठा बळी गेला आहे. १६५ दुधाळ जनावरे, ३६ लहान जनावरे आणि सहा ओढकामाची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्याही पुनर्वसनाची मागणी होत आहे.

घरांची पडझड, रस्ते वाहून गेले

अतिवृष्टीमुळे १०३७ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी सात घरे पूर्णतः कोसळली असून चार गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेलाही फटका बसला असून १५ तलाव फुटले, १२ रस्ते व तीन पुलांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरु करून १६ गावांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित केला आहे.

बचाव कार्यातून ४९८ नागरिकांची सुटका

पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी शोध व बचाव मोहिम राबवली. यातून ४९८ नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

सद्यस्थितीत परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असली तरी अजूनही मोठ्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढील काळातील धोका लक्षात घेऊन तयारी ठेवली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#villages#distric#mostdamage#paranda#area#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा लैंगीक अत्याचार

Next Post

एकत्र येऊन माती आणि माणूस उभा करू; शेतकऱ्यांना धीर देणारी आमदार कैलास पाटील यांची पोस्ट चर्चेत

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

एकत्र येऊन माती आणि माणूस उभा करू; शेतकऱ्यांना धीर देणारी आमदार कैलास पाटील यांची पोस्ट चर्चेत

तुळजापूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली ; चार दिवसात दोन टोळ्या ताब्यात

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group