• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 12, 2026
in सामाजिक
0
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

प्रस्तावित नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा किंवा त्याची अलाईनमेंट बदलून सुपीक शेती वाचवावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या महामार्गामुळे हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याने शासनाने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित ८५६ किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील हजारो हेक्टर सुपीक, बागायती आणि बारमाही ओलिताखालील शेती बाधित होणार आहे. अनेक पिढ्यांपासून शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन धोक्यात येणार असून शेतीचे अपरिमित नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, नागपूर ते रत्नागिरी दरम्यान आधीच महामार्गाची सुविधा उपलब्ध असून त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नव्याने मोठ्या खर्चाचा महामार्ग उभारण्यासाठी सुपीक शेती संपादित करणे आणि शेतकऱ्यांना विस्थापित करणे अन्यायकारक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गाच्या अनुभवाचा उल्लेख करत, अशा प्रकारच्या महामार्गांमुळे नैसर्गिक जलवाहिन्या आणि पाण्याचे प्रवाह बाधित होतात. परिणामी शेतीचे नुकसान होऊन सुपीक जमीन खारपड होण्याचा धोका वाढतो, अशी भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करावा किंवा पर्यायी अलाईनमेंट निश्चित करून शेतीचे नुकसान टाळावे, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ गावातून शक्तिपीठ महामार्ग जात असून, या महामार्गाला शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध केला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी हा विषय घेतल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या विरोधाला बळ मिळणार आहे.

SendShareTweet
Previous Post

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

Related Posts

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

November 29, 2024

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

August 13, 2024

24 तारखेला ओबीसींचा मेळावा नाही, धाराशिवमध्ये नवीन कोअर कमिटीची स्थापना,काहीजणांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

January 17, 2024

2 लाख बांधवांच्या उपस्थितीत 24 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा; छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकरांसह 20 नेत्यांचे मार्गदर्शन

January 15, 2024

सभापती असूनही निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेईनात; पाणीपुरवठा सभापतींचा तडकाफडकी राजीनामा

January 9, 2024

कळंबमध्ये शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

January 7, 2024

ताज्या घडामोडी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026
श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

July 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group