• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, February 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

‘ए आय’ च्या वापरातून जिल्ह्यातील ऊस उत्पादनात होणार 40 टक्क्यांची वाढ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 12, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
167
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मदतीने जिल्ह्यातील 20 हजार हेक्टरवर होणार ‘ए आय’ चा वापर

उत्पादन खर्चात आणि पाण्यात होणार 30 टक्क्यांची बचत

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्ह्यात ऊस उत्पादनात क्रांती घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (ए आय) आधारित महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र 55 हजार हेक्टरहून अधिक असून, यापैकी 20 हजार हेक्टरवर ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे, पाणी बचत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऊस उत्पादनात एआय तंत्रज्ञानाचा वापर कृषी विज्ञान केंद्र, बारामती, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ, पाणीवापरात 30 टक्केपर्यंत बचत, उत्पादन खर्चात 25-30 टक्के बचत, पारंपरिक पद्धतीपेक्षा 50-70 टक्के अधिक नफा, कीड व रोगांविषयी आगाऊ माहिती मिळणे अशा पद्धतीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

या प्रकल्पासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर खर्च अपेक्षित आहे. यापैकी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 9250 रुपये, संबंधित साखर कारखाना 6750 रुपये तर शेतकऱ्यांचा वाटा 9000 रुपये असणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

हे अर्ज ‘पहिले येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर स्वीकारले जाणार आहेत. यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करणारे शेतकरी, एकाच प्रकारची जमीन असलेले गटबद्ध शेतकरी (25-40 शेतकरी गट) यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी शेतकरी सदस्य असलेल्या कारखान्यांकडे तात्काळ करारनाम्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

तसेच एआय प्रणालीत हवामान केंद्र आणि मातीतील सेन्सरद्वारे पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन याबाबत अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात बैठक गुरुवारी (दि.10) पार पडली. या बैठकीला नॅचरल शुगरचे बी.बी.ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे तसेच 16 साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुजार यांनी प्रत्येक साखर कारखान्याने किमान 250 शेतकरी आणि 20 टक्के क्षेत्र (20000 हेक्टर) या प्रकल्पांतर्गत आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. शेतकऱ्यांचे करार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे तात्काळ सादर करून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

एआय तंत्रज्ञानामुळे ऊसशेतीत होणारे फायदे

– ऊसाच्या उत्पादनात 40% वाढ होणार

– जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत

– खतांच्या वापरात सुमारे 30% घट

– उत्पादन खर्चात 20 ते 40 टक्क्यांची बचत

– सुमारे ३० टक्के पाण्याची बचत

– शेतकऱ्यांना पीक पद्धतीबद्दल अचूक सूचना

– साखर उतारा 0.5 ते 2% ने वाढवणं शक्य

प्रयोगशील शेतकऱ्यांना मोठी संधी

ऊस उत्पादनात एआय चा वापर करून शेतकऱ्यांना उत्पादनात भरघोस वाढ करता येईल. शिवाय यामुळे उत्पादन खर्च कमी होणार आहे. ज्या कारखान्याचे शेतकरी सभासद आहेत, त्या कारखान्याकडे शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत. जो प्रथम अर्ज करेल त्याला याचा लाभ मिळणार आहे. कारखाना आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे खर्चाचा बराचसा भाग उचलणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च खूप कमी होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये ठिबक सिंचन असणे अनिवार्य आहे. ऊस उत्पादनात प्रयोगशील शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ही मोठी संधी आहे.

रवींद्र माने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#sugarcane#farmer#farming#
SendShareTweet
Previous Post

सोयाबीन खरेदीत 23 शेतकऱ्यांची 62 लाखांची फसवणूक

Next Post

ढोकी येथील शासकीय रोपवाटिकेच्या जागेवर अतिक्रमण

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

ढोकी येथील शासकीय रोपवाटिकेच्या जागेवर अतिक्रमण

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्या, उद्योगासाठी बाहेर पडा

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group