प्रतिनिधी / धाराशिव
परिस्थितीवर मात करून शेती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडक ५ शेतकऱ्यांचा सन्मान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषीदिन साजरा करण्यात आला. कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे हा कार्यक्रम पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
महाराष्ट्र कृषी दिनी शनिवारी (दि.१) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी कन्हेरवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात कृषी क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या ५ शेतकऱ्यांना सन्मानित केला. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी व कृषी विकासासाठी मोठे योगदान आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते. त्यामुळे स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधून यावेळी आनंद मिटकरी या युवकाचा बीएससी कृषी पदवी घेऊन शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानोबा गायकवाड, सुभाष कवडे, वैजीनाथ कवडे, रामभाऊ कवडे, पांडुरंग जाधव आदींचा दुधगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे वक्ता विभाग तालुकाध्यक्ष प्रा. रणजित वरपे, विशाल मिटकरी, चंद्रकांत जाधव, धर्मराज कवडे, सुरेश कवडे, विलास जगताप, वसुदेव सावंत, जालींदर कवडे, दत्तात्रय शिंदे, दयानंद जगताप, रामभाउ कवडे, कमलाकर नारायण कवडे, बाळासाहेब कवडे, पांडूरंग जाधव, विठ्ठल धोंगडे, विश्वनाथ गायकवाड, श्रीकांत मिटकरी, प्रसाद कवडे, अरुण सावंत, बादल सावंत, अनंत कवडे, बाळासाहेब कवडे, अंगद कवडे, श्रीनाथ मिटकरी, रणजीत ओमन आदी उपस्थित होते.











