• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 20, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

चव्हाण साहेब तुम्ही सुद्धा..?, 11 वेळा काँग्रेसचे खासदार दिलेल्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते पडताहेत पक्षाबाहेर, 5 वेळा आमदार,मंत्री राहिलेल्या चव्हाणांच्या भूमिकेवर संशय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 21, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1.4k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सलग 45 वर्षे खासदार, आणि 3- 3 आमदार, आता पक्षाकडे एकही आमदार नाही,

चव्हाण म्हणातात, मी पक्ष सोडणार नाही, बदनामी कराल तर माफी नाही

चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी 

धाराशिव ; वाऱ्याची दिशा बदलावी तशी माणसं,विचार आणि तत्व बदलत आहेत. राजकारणाकडे उद्योग,व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी झाली आहे. त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे नेता,अशी स्थिती आहे. काँग्रेसला तर 1951 पासून 1991 पर्यंत सुमारे 45 वर्ष या जिल्ह्याने खासदार दिले. काही वेळा पक्षाचे तीन तीन आमदार राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थेतही काँग्रेसची हवा होती पण आता ही हवा बदलली आणि नेतेही. सत्ता बदल होत असतोच. पण याकाळात नेतेही पक्षात राहायला तयार नाहीत. 11 वेळा खासदार दिलेल्या या जिल्ह्यात आता पक्षासाठी बलाढ्य नेता राहिला नाही, बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर जेष्ठ नेते मधुकर चव्हाण यांच्या एकूणच भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळेच शेतकरी कामगार पक्षापाठोपाठ आता काँग्रेसची स्थिती बिकट होणार का,असा प्रश्न पडत आहे.

सलग 45 वर्षे काँग्रेसचे 11 वेळा खासदार

1951 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत राघवेंद्र दिवाण यांच्या माध्यमातून उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाने काँग्रेसचा पहिला खासदार निवडून दिला. ही निवडणूक शेतकरी कामगार पक्षविरुद्ध काँग्रेस अशी झाली होती. या निवडणुकीत पक्षाने मतदारसंघावर घेतलेला ताबा सुमारे 45 वर्ष म्हणजे 1991 पर्यंत कायम राहिला. व्यंकटराव नळदुर्गकर,तुळशीराम पाटील, तुकाराम शृंगारे, त्र्यंबक सावंत, अरविंद कांबळे, अशा पक्षाच्या एकाहून एक अधिक बलाढ्य नेत्यांनी मतदारसंघावर सत्ता गाजवली. अर्थातच विधानसभा, विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावपातळीवर सुद्धा काँग्रेस पक्षाचा प्रचंड दबदबा होता. उलटपक्षी शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी ज्या पक्षाचा उदय झाला, अशा शेतकरी कामगार पक्षाला उस्मानाबादच्या मतदारांनी एकदाही लोकसभा मिळू दिली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महत्त्व आणि दबदबा अधोरेखित होतो. उस्मानाबाद लोकसभेचा इतिहास पाहिला तर 1951 मध्ये राघवेंद्र दिवाण पहिले खासदार म्हणून काँग्रेस पक्षाकडून निवडून आले. त्यानंतर 1957 मध्ये व्यंकटराव नळदुर्गकर, 1962, 1967 आणि 1971 असे 3 वेळा तुळशीराम पाटील लोकसभेवर निवडून गेले. 1977 मध्ये तुकाराम शृंगारे, त्यानंतर 1980 मध्ये त्र्यंबक सावंत, 1984,1989 आणि 1991 या तिन्ही लोकसभा निवडणुकीत अरविंद कांबळे निवडून आले. हा 45 वर्षाचा संपूर्ण काळ काँग्रेसच्या खासदारांचा राहिला. त्यानंतर 1996 मध्ये शिवसेनेचे शिवाजी कांबळे निवडून आले. 1998 मध्ये पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांना संधी मिळाली. 1999 मध्ये शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांना दुसऱ्यांदा उस्मानाबादकरांनी खासदार बनवले. 2004 मध्ये कल्पनाताई नरहिरे शिवसेनेच्या खासदार झाल्या. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.पद्मसिंह पाटील, 2014 मध्ये शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड आणि 2019 मध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेनेकडून निवडून आले. लोकसभेच्या 74 वर्षाच्या कार्यकाळात सर्वाधिक 45 वर्षाचा कार्यकाळ आणि 11 खासदार काँग्रेस पक्षाचे राहिले. पाच वेळा शिवसेनेचे खासदार तर एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार या मतदारसंघात निवडून आले. वास्तविक पाहता काँग्रेसने इतकी वर्ष सत्ता मिळवली तरी आता मात्र वाऱ्याची दिशा बदलली आहे. काँग्रेस पक्षाला दररोज नवनवे हादरे बसत आहेत. गेल्या महिन्यात माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षातून दोन वेळा आमदार राहिलेल्या पाटील यांच्या बाहेर पडण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यापाठोपाठ दुसरा धक्का माजीमंत्री आणि पाच वेळा आमदार राहिलेले तुळजापूरचे काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण यांनी दिला आहे. त्यांनी चार दिवसांपूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट घेऊन मुलगा सुनीलराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाची तारीख आणि वेळ निश्चित केली होती. सुनील चव्हाण यांच्यापाठोपाठ मधुकरराव चव्हाणही काँग्रेस पक्षातून बाहेर पडतात की काय अशी चर्चा आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींनी पक्षातून बाहेर पडणं काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.मात्र,चव्हाण यांनी आपण शेवटपर्यंत काँग्रेस पक्ष सोडणार नाही असे स्पष्ट करतानाच माझी बदनामी करणाऱ्यांना माफी नाही असा इशारा दिला आहे.

नेत्यांची अगतिकता, सत्ता तिकडे नेता

सध्या जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात एकही विधानसभा नाही तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतूनही काँग्रेसचा दबदबा कमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांची अगतिकता वाढत असून, त्यामुळे सामान्य कार्यकर्तेही सैरभैर आहेत. अशा काळात सत्तेच्या दिशेने वारे वाहू लागले आहे. बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी पक्षाशी फारकत घेतली तर नवी पिढी काँग्रेसच्या विचाराकडे आकर्षित होईल का, की सत्तेच्या बाजूनेच राजकारणाची दिशा राहील, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.मात्र पक्षाने अनेक पदे,संधी,सन्मान देऊनही ज्येष्ठ नेते पक्षातून बाहेर पडत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांना संताप आल्यावाचून राहत नाही. 

निष्ठा वगैरे नाही, राजकारणात चालते ठेकेदारी

एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची जिल्ह्यात सत्ता होती. जिल्ह्यातील जवळपास 90% स्थानिक स्वराज्य संस्था शेकापच्या ताब्यात होत्या. तुळजापूर नगरपरिषद तर 2004 पर्यंत पक्षाने ताब्यात ठेवली. मात्र आता 20 वर्षात हा पक्ष स्पर्धेतही राहिला नाही. किंबहुना पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. तत्व आणि विचार या पलीकडे पक्षाने सत्तेचा कधीही विचार केला नाही. सर्वसामान्य माणूस, कष्टकरी, शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून विचारावर चालणारा हा पक्ष आता इतिहासजमा होतो की काय अशी परिस्थिती आहे. वर्तमान राजकारणात मात्र पक्षांना विचारधारा राहिलेली नाही. पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनाही आता राजकारणातून पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवायची आहे. अर्थार्जन चालले तरच निष्ठा वगैरे..पक्षात काम करायचं म्हणजे व्यवसायाचं काय, असा प्रश्न केला जातो.मग नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना ठेकेदारी मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र ज्यांच्याकडे सत्ताच नाही त्यांना ठेकेदारीचे कार्यकर्ते जगवणे अशक्य आहे. अशीच अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे . सत्ता नसल्यामुळे ठेकेदारी मिळवून कार्यकर्ते सांभाळणं आवाक्याबाहेर आहे.नेत्यांनाही पुढच्या पिढीला काहीतरी मिळवून द्यायचं आहे. या पार्श्वभूमीवर जिकडे सत्ता तिकडे नेता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नेतेच रात्रीतून पक्ष बदलतात, कार्यकर्त्यांचा दोष काय?

गेल्या काही वर्षात विशेषतः महाराष्ट्रातील राजकारण नवे वळण घेत आहे. तत्व, विचार,निष्ठा यापलीकडे जाऊन नेते, लोकप्रतिनिधीही रात्रीतून पक्ष बदलून विचारांशी तडजोड करत आहेत.5 वर्षापूर्वी असलेली विचारधारा एकाही पक्षाकडे उरलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा नेत्यांवरचा विश्वास उडत आहे. तत्व आणि निष्ठा हे शब्द नेत्यांच्या भाषणात आले की कार्यकर्ते चुळबुळ करत असतात. त्यामुळे नेत्यांनी निष्ठा शिकवावी अशी परिस्थिती राहिली नाही,असे कार्यकर्ते जाहीरपणाने सांगतात.

Tags: #commaharashtra #eknathshinde #devendraphadanvis #ajitdadapawar
SendShareTweet
Previous Post

Osmanabad loksabha election अर्चनाताई पाटील शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज, दोन्ही उपमुख्यमंत्री येणार..? थोड्याच वेळात जोरदार शक्तिप्रदर्शन करून ओमराजे भरणार उमेदवारी

Next Post

व्यवसायिक अविनाश हंगे यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन, दुपारी अंत्यसंस्कार

Related Posts

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025

Tuljapur Drugs तुळजापूर श्रद्धेचं, भक्तीचं, अस्मितेचं प्रतीक..ड्रग्स प्रकरणात सत्य शोधा, बदनामी नको; तुळजापूरच्या कन्येचं माध्यमांना आवाहन

April 12, 2025

Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

March 29, 2025

कसली ही थट्टा..? 500 बेडचे रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रत्येकी एक हजाराची तरतूद

March 16, 2025
Next Post

व्यवसायिक अविनाश हंगे यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन, दुपारी अंत्यसंस्कार

Osmanabad loksabha 1951 मध्ये अशी झाली होती उस्मानाबादची पहिली निवडणूक, 73 वर्षातली यंदाची निवडणूक यासाठी ठरणार वेगळी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

May 19, 2025

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group