• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 8, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ओमराजेंना सांगा पैलवान तयार आहे.. राष्ट्रवादीच्या सुरेश बिराजदारांनी दंड थोपटले; म्हणाले, संधी द्या, कर्तृत्व सिद्ध करू, सर्वसमावेशक चेहरा म्हणून सर्व पक्षातले सहकारी सोबत असल्याचा दावा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 11, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मला संधी मिळाली नाही म्हणून आमदार – खासदार होऊ शकलो नाही. त्यामुळे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मर्यादा आल्या.पण ज्या पदावर काम केले. त्याठिकाणी अत्यंत समाधानकारक काम केले. खासदार ओमराजे निंबाळकर यांना सांगा पैलवान तयार आहे, असे आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड थोपटले आहेत.ते म्हणाले, मी 7 वर्षे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी प्रयत्न केले. अगदी भूकंपाच्या काळात देखील अहोरात्र मेहनत करून दुर्घटनाग्रस्तांना मदत केली.त्यामुळे राजकारणातीलच नव्हे तर राजकारणाव्यतिरिक्त लोक माझ्यासोबत आहेत. महायुतीसोबतच महाविकास आघाडी आणि वंचितचे पदाधिकारी लोकसभेसाठी माझ्यासोबत राहण्याचा शब्द देत आहेत. संधी मिळाल्यास जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लोकसभा मतदारसंघात दाजी फॉर धाराशिव मोहीम राबविण्यात येत आहे.महायुतीमध्ये लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रा.बिराजदार यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनी सूचना दिल्यामुळे लोकसभेसाठी मतदारसंघात फिरत आहोत. राष्ट्रवादी सोबतच ईतर पक्षाच्या लोकांसोबत संवाद साधत आहे. 1992 पासून झेडपी सदस्यपदापासून जिल्हा बँकेच्या चेअरमनपदापर्यंत अनेक पदावर कामे केली. या काळात सहवासात आलेला प्रत्येक सहकारी आपलासा झाला. सगळ्यांचं म्हणणं आहे, दाजी उमेदवार असतील आम्ही सोबत आहोत. अगदी महविकास आघाडी, वंचितचे सहकारी सोबत आहेत. सगळे साथ द्यायला तयार आहेत.आज उमेदवारी कुणाचीही निश्चित नाही, पण कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही ताकदीने प्रचार करू. श्रेष्ठी देतील त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे सगळ्या पक्षात संबंध आहेत, त्यामुळे मला अधिक पाठिंबा मिळत आहे.आमदारआपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार नाहीत, मग लोकसभेला उमेदवारी कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेजारच्या बीड जिल्ह्यात भाजप किंवा अन्य पक्षाचे लोकप्रतिनिधी असतानाही उमेदवारी दिली गेली.कर्तृत्व कधी सिद्ध करणारं, तसं पदच मिळालं नाही तर मूल्यमापन कसे करणार,असा प्रश्न उपस्थित करून बिराजदार म्हणाले, उमरगा मतदारसंघात 1999 पासून आरक्षण आहे,त्यामुळे संधी मिळाली नाही. जिल्हा बँकेचा 7 वर्षे चेअरमन असताना मी अडचणीत असलेल्या बँकेला अडचणीतून बाहेर काढले.कोर्टात जाऊन थकहमीच्या माध्यमातून पैसे मिळावेत, यासाठी पुढाकार घेतला. तेरणा, तुळजाभवानी कारखान्यामुळे जिल्हा बँक अडचणीत आली होतीस त्यावर पीएफ कार्यालयाने कारखान्याचा लिलाव काढला होता. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात तडजोड करून निकाल आपल्या बाजूने लावून घेतला. दोन वर्षात बँकेला पैसे मिळतील. बँक पूर्णपणे अडचणीतून बाहेर येईल. प्रचंड अडचण असताना ऊस अतिरिक्त झाल्यानंतर आम्ही शरद पवार, अजित पवार यांच्याकडे गेलो, कारखाना सुरू केला. भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या माध्यमातून 27 वर्षे अत्यंत पारदर्शक काम केले. किल्लारी कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला.अडचणीत असलेल्या अनेक कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासनाने 198 विकास संस्था अवसायनात काढल्या होत्या. संचालक मंडळाचा दोष नाही. शासनाला परिस्थिती लक्षात आणून दिली. दिलीप वळसे पाटील यांना विनंती केली. त्यांनी निर्णयाला स्थगिती दिली. 3 वर्षे चालू बाकी असलेल्या शेतकऱ्यांनाच 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा नियम होता. जिल्ह्यातील 55 हजार पैकी 30 हजार सभासद वंचित राहणार होते.आमदार-खासदारांचे हे काम असताना मी मुंबईला गेलो आणि जयंत पाटील, अजित पवारांना भेटलो.जिल्हा बँकेच्या अडचणीचा विषय होता. शेवटच्या कॅबिनेटमध्ये आपल्यासाठी निर्णय बदलला आणि त्याचा फायदा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना झाला.असा शेतकऱ्यांसाठी अनेक बाजूंनी पाठपुरावा केला.1992 जिल्हा परिषद सदस्य झालो, 1993 ला भूकंप झाला. आमच्या भागात यामध्ये 10 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यापासून पुनर्वसनाची कामे केली. अनेक अडचणी येत होत्या. पण मी स्वतः सिव्हील इंजिनियर असल्याने जागांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करू शकलो. शरद पवार, डॉ.पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू शकलो.दरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे, प्रवीण यादव यांनीही बिराजदार यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले.

SendShareTweet
Previous Post

Breaking धाराशिव शहरात ढोबळे कॉम्प्लेक्समध्ये तरुणाची आत्महत्या, शहरात खळबळ

Next Post

कळंब शहर कडकडीत बंद, बाजारपेठेत शुकशुकाट, रस्त्यावरील गर्दीही ओसरली

Related Posts

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025

Tuljapur Drugs तुळजापूर श्रद्धेचं, भक्तीचं, अस्मितेचं प्रतीक..ड्रग्स प्रकरणात सत्य शोधा, बदनामी नको; तुळजापूरच्या कन्येचं माध्यमांना आवाहन

April 12, 2025

Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

March 29, 2025

कसली ही थट्टा..? 500 बेडचे रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रत्येकी एक हजाराची तरतूद

March 16, 2025

मोठी बातमी; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 4 सरपंचसाह 93 सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

March 14, 2025
Next Post

कळंब शहर कडकडीत बंद, बाजारपेठेत शुकशुकाट, रस्त्यावरील गर्दीही ओसरली

Breaking उद्धव ठाकरे शुक्रवारी धाराशिव जिल्ह्यात; उमरगा, तुळजापूर येथे सभा; धाराशिव शहरात मुक्काम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

दारू प्यायली म्हणून दहिवडी येथे बापानेच केला मुलाचा खून

May 7, 2025

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर शिखर समितीची मान्यता

May 6, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group