• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 9, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भाई उद्धवराव दादांनी केली होती सोलापूर-धाराशिव-जळगाव रेल्वेमार्गाची पहिली मागणी, पहिल्या टप्प्यात धाराशिवपर्यंतच्या मार्गाचे काम होणार: उर्वरित मार्गासाठी प्रयत्नांची गरज

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 12, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
614
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

चंद्रसेन देशमुख / धाराशिव

दक्षिणोत्तर भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी पहिली मागणी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. भाई उद्धवराव दादा पाटील यांनी केली होती. त्यानंतर या मागणीला महाराष्ट्रातील खासदारांनी बळ दिले. गेल्या 65 वर्षापासून होत असलेल्या या मागणीला आता कुठे बळ मिळत आहे. सोलापूर ते जळगाव- बुऱ्हाणपूर असा नियोजित मार्ग असला तरी पहिल्या टप्प्यात सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गाचे काम सुरू होत आहे. आज भाई उद्धवराव दादा पाटील यांचा स्मृतिदिन असून, या निमित्ताने दादांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढच्या टप्प्यातील रेल्वेमार्गाला गती देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. धाराशिवला विकासाच्या टप्प्यावर आणण्यासाठी दादांनी या रेल्वेमार्गाची मागणी लावून धरली होती.


दक्षिण व उत्तर भारत रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी सध्या खांडवा-मनमाड-दौंड मार्गे सोलापूर असा मार्ग आहे. मात्र यामुळे साधारण ४५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर वळसा घालून दक्षिणेत जावे लागते. या पार्श्वभूमीवर 6 दशकापासून बुऱ्हाणपूर ते सोलापूर या रेल्वेमार्गाची मागणी होत आहे. यासाठीचे सर्व्हेक्षणही दहा वर्षांपूर्वी झाले. मात्र, त्यापैकी केवळ सोलापूर ते धाराशिव या रेल्वेमार्गाची घोषणा झाली असून उर्वरित मार्गाचा कालबद्ध कार्यक्रम कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या उत्तर भारतातून दक्षिण भारतात रेल्वेने जाण्यासाठी बुऱ्हाणपूर येथून जळगाव, मनमाड, दाैंड, कुर्डुवाडी मार्गे सोलापूरवरून खाली दक्षिणेत जावे लागते. दुसरा मार्ग नांदेड-हैदराबादवरून पुढे दक्षिणेत जातो. परंतु, हे दोन्ही मार्ग साधारण तीनशे ते चारशे किलोमीटरचा वळसा घालून दक्षिण भारतात जातात. या पार्श्वभूमीवर वळसा घालून जाण्याऐवजी थेट बुऱ्हाणपूर-मलकापूर-बुलढाणा-जालना-बीड-कळंब- धाराशिव-तुळजापूर-सोलापर हा रेल्वेमार्ग जोडल्यास सदरचे अंतर 400 किलोमीटरने कमी होऊन वेळेतही सहा ते सात तासांची बचत होणार आहे. यासाठी नागरिकांबरोबरच लाेकप्रतिनिधींच्या मागणीचा जोर कमी पडत असल्याने याबाबत सर्व्हेक्षणाच्या पुढे कोणतीही प्रगती होताना दिसत नाही. सोलापूर-धाराशिव या मार्गावरील कामाची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. आर्थिक संकल्पात तरतूद झाल्यामुळे कामाची लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

२००८ मध्ये सोलापूर-जळगाव मार्गाचे सर्वेक्षण
सोलापूर ते जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण २००८ मध्ये करण्यात आले होते. यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी बजेटमध्ये तरतूद केली होती. नंतर मात्र कोणतीच प्रगती झाली नाही.वास्तविक, या मार्गावर ९ खासदारांचे मतदारसंघ आहेत तरीही पाठपुराव्याला बळ मिळत नाही. त्यात मराठवाड्यातील चार व पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेशमधील प्रत्येकी एका जिल्ह्यातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गावरील भागात ९ मातब्बर खासदार संसदेत लोकप्रतिनिधीत्व करतात. त्यांच्याकडून एकत्रित प्रयत्नाची जोड दिल्यास नक्कीच या रेल्वेमार्गाला गती मिळू शकते. हा रेल्वेमार्ग सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, बुलडाणा आदी जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे दक्षीण-उत्तर प्रवास याच मार्गाने होणार असल्याने या मार्गावरील जिल्ह्यातील मागासलेपण दूर होण्यास मदत होणार आहे.


या रेल्वेमार्गासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते तत्कालीन खासदार भाई उद्धवराव पाटील यांनी १९६० मध्ये सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामार्फत या रेल्वेमार्गासाठी पहिली मागणी केली होती. त्यानंतरच्या काळात अनेक खासदारांनी तसेच रेल्वे लोकआंदोलन समितीनेही आपआपल्या पातळीवर प्रयत्न केले. परंतु हे काम सरकू शकले नाही.

असा होईल फायदा
सोलापूर ते बुऱ्हाणपूर रेल्वेमार्ग झाल्यास या मार्गावरील मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्याच्या विकासांना चालना मिळणार आहे. तसेच दक्षीणेतून उत्तरेकडे अथवा उत्तरेतून दक्षिणेत जाणाऱ्या नागरिकांचे ४५० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. यासाठी राजकीय पाठबळाची गरज आहे, अशी अपेक्षा रेल्वे लाेकआंदोलन समितीचे अध्यक्ष प्रभाकर निपणीकर यांनी व्यक्त केली.

SendShareTweet
Previous Post

धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा; लवकरच तारीख जाहीर होणार, कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची शहरात पाहणी

Next Post

अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार; संजय राऊत यांच्याकडून लढण्याची प्रेरणा

Related Posts

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025

Tuljapur Drugs तुळजापूर श्रद्धेचं, भक्तीचं, अस्मितेचं प्रतीक..ड्रग्स प्रकरणात सत्य शोधा, बदनामी नको; तुळजापूरच्या कन्येचं माध्यमांना आवाहन

April 12, 2025

Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

March 29, 2025

कसली ही थट्टा..? 500 बेडचे रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रत्येकी एक हजाराची तरतूद

March 16, 2025

मोठी बातमी; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 4 सरपंचसाह 93 सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

March 14, 2025
Next Post

अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार; संजय राऊत यांच्याकडून लढण्याची प्रेरणा

वाशी तालुक्यात ५० टक्के खरिपाची पेरणी, १३५ मिलिमीटर पावसाची नोंद; मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील विकास कामांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत घेतली बैठक

May 9, 2025

गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला ढोकी येथून पकडले

May 9, 2025

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group