• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 6, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सध्याचं राजकारण सामान्यांच्या आकलनशक्तीच्या बाहेरचं आहे; जास्त विचार करू नये, नाहीतर दिगू टिपणीसप्रमाणे वेळ येईल !

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 6, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
141
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

-सज्जन यादव,धाराशिव (मो.96896 57871)

गेल्या चार दिवसात राज्याच्या राजकारणात ज्या अभूतपूर्व गोष्टी घडत आहेत,त्याचे रोज नवनवे अंक सुरूच आहेत. काल राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेगवेगळे मेळावे घेतले. दोन्ही मेळाव्याना गर्दी होती. परंतु यात अजित पवारांची सरशी झालेली दिसते. अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांची भाषणं धक्कादायक होती. खूप वर्षांपासूनची सल या तिघांनीही काल बोलून दाखवली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भाषणात विशेष काहीच नव्हते. त्यांनी ना भावनिक आवाहन केले ना अजित पवार गटावर टीका केली. आम्ही जनतेत जाऊ असे जरी शरद पवार म्हणत असले तरी ते लोकांना कितपत अपील होईल याबद्दल शंका आहे. शरद पवार वारंवार १९८० चा दाखला देतात. त्यावेळी ६२ आमदार त्यांना सोडून गेले होते त्यापैकी नंतरच्या निवडणुकीत फक्त सहाच आमदार निवडून आले. १९८० ची ही घटना खरी आहे. त्यावेळी शरद पवारांचे वय फक्त चाळीस होते, शिवाय १९७८ ते १९८० या दोन वर्षात ते मुख्यमंत्री होते. त्यांनी पुलोदचा प्रयोग यशस्वी केला होता आणि ते राजकारणातील अमिताभ बच्चन बनले होते. शरद पवारांचे त्यावेळचे राजकारण प्रचंड आक्रमक होते. राजकारणातील त्यांची तेंव्हाची ताकद, समज आणि धमक याला सीमा नव्हती त्यामुळेच लोक शरद पवार या नावाला घाबरत होते.


परंतु तो काळ आता बदलला आहे. शरद पवार या नावाभोवती आजही प्रसिद्धीचे प्रचंड मोठे वलय आहे. परंतु १९८० चे शरद पवार आज नाहीत. त्यांचे वय त्यांच्यासोबत नाही. ज्यांना ते वारसदार म्हणून पुढे आणत आहेत त्या सुप्रिया सुळे पहिल्यापासूनच दरबारी राजकारणातील नेत्या आहेत. सुप्रिया सुळे या लोकांत मिसळून काम करू शकत नाहीत. सुप्रियांचे राजकारण हे कायम अजित पवार आणि शरद पवार या दोन कुबड्या घेऊन पुढे गेलेले आहे. आता संघर्षाची वेळ आल्यावर सुप्रिया सुळे यांच्या मर्यादा स्पष्ट दिसतात. दुसरी गोष्ट आहे सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सौम्य भूमिकेची. त्या अजूनही अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत नाहीत.जोपर्यंत सुप्रिया सुळे या अजित पवारांप्रमाणे प्रोफेशनल राजकारणी बनू शकत नाहीत तोपर्यंत त्या पक्ष सांभाळू शकत नाहीत. त्यांना यावेळी पक्ष सांभाळायचा आहे की नाती सांभाळायची आहेत हे ठरवून दोन्हीपैकी एकाची निवड करावीच लागेल.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर तीन महिन्यातच हा पक्ष सत्तेवर आला होता. राज्यात सलग पंधरा वर्षे आणि केंद्रात सलग दहा वर्षे सत्ता असल्यामुळे या पक्षात घाऊक प्रमाणात नेते तयार झाले. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, विजयकुमार गावित, गणेश नाईक हे नेते सलग दहा-पंधरा वर्षे मंत्री राहिलेले आहेत. हे लोकं फक्त नेते नाहीत तर सुभेदार आहेत. जिकडे सत्ता तिकडे हे सुभेदार चाकरी करणार. सलग पंधरा वर्षे सत्ता असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर कधी संकट आलेच नाही. २०१४ नंतर मात्र गणेश नाईक, विजयकुमार गावित यासारख्या नेत्यांनी वाऱ्याची दिशा ओळखून भाजपला जवळ केले. राष्ट्रवादी पक्ष सोडून हे नेते भाजपा कडून निवडून आले. शरद पवार यांच्याकडून या नेत्यांची काहीच राजकीय हानी होऊ शकली नाही कारण हे नेते त्या त्या भागातील सुभेदार आहेत. तीच गोष्ट डॉ पद्मसिंह पाटील यांच्या पुत्राची. राणाजगजितसिंह पाटील यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला. एक महिन्यात त्यांनी त्यांच्या उस्मानाबाद मतदार संघातून निवडणूक न लढवता तुळजापूर मतदार संघातून निवडणूक लढवली आणि कित्येक वर्षे मंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला. यावरून एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शरद पवार या नावाशिवाय आणि त्यांच्या पक्षाशिवाय हे सुभेदार नेते कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष निवडून येऊ शकतात.


शिवसेनेत पडलेली फूट आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट यांमध्ये खूप मोठा फरक आहे. शिवसेना हा पक्ष भावनिक आणि व्यक्तिकेंद्री पक्ष आहे. फक्त बाळासाहेब ठाकरे या एका नावाला पाहून आजही शिवसेनेत मते मिळतात मग तो उमेदवार कोणीही असो. नारायण राणे यांच्याबाबतीत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उदाहरण पाहता येईल. मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे या नेत्याला शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचे वलय अजूनही निर्माण करता आलेले नाही. तसे राष्ट्रवादी पक्षाचे नाही. आजपर्यंत त्या पक्षाचा उमेदवारच तगडा असायचा. शरद पवार नावाची ताकद फक्त पुश करण्यासाठी असायची. साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात पावसात भिजलेल्या एखाद्या सभेचा अपवाद वगळला तर शरद पवार यांच्या एखाद्या सभेमुळे खूप मोठा उलटफेर होऊ शकतो हे दिवस आता राहिलेले नाहीत.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील धुसफूस आजची नाही. सत्तेशिवाय हा पक्ष फार काळ राहू शकत नाही याची जाणीव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पहिल्यापासून होती. राष्ट्रवादीच्या एकूण एक सुभेदार असणाऱ्या नेत्यांचे हात भ्रष्टाचार नावाच्या मोठ्या दगडाखाली अडकलेले आहेत. ईडी-सीबीआय च्या धाकाने हे दगड हलवले की या सुभेदारांना वेदना होतात. छगन भुजबळ सारख्या नेत्यांना या वेदना किती तीव्र आहेत याची पुरेपूर जाणीव आहे. हसन मुश्रीफ सारखे बरेच नेते सुपात होते, जात्यात जाण्याच्या अगोदर त्यांना ठोस कृती करणे अपरिहार्य होते. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या सुप्त इच्छेला राष्ट्रवादीमार्फत फळ मिळेल याची सध्या शाश्वती नाही. विचारसरणी वगैरे या न पचणाऱ्या गोष्टी अजित पवार सारखे महत्वाकांक्षी नेते कधीच करत नसतात. प्रफुल्ल पटेल सारखे राजकीय दलाल ‘हा ही चांगला’, ‘तो ही चांगला’ या नाना पाटेकर सारख्या भूमिकेत असतात. दिल्लीत राहून प्रत्येक दरबारात मुजरा घालून खबरबात घेणे ही कला काही लोकांना उत्तम जमत असते. शरद पवारांसाठी हे लोक सत्ता असेपर्यंत उपयोगाचे असतात. परंतु सत्ता नसते तेंव्हा या लोकांचे उपद्रव मूल्य प्रचंड हानिकारक असते.
सुप्रिया सुळे दिल्लीत रमणाऱ्या राजकारणी आहेत. त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून द्यायची जबाबदारी देखील अजित पवार हेच पार पाडत होते. प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील हे मास लीडर नाहीत. फक्त प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे लोक त्यांना जास्तीचा भाव देत होते. एरव्ही त्यांची ताकद त्यांच्या जिल्ह्यापुरती देखील नाही. परंतु एकाही भ्रष्टाचारात त्यांचे हात बरबटलेले नाहीत ही त्यांची जमेची बाजू आहे. ज्या जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल अजित पवार गटाला आकस आहे त्या जितेंद्र आव्हाड यांची ताकद मुंब्रा या त्यांच्या मतदारसंघापुरती मर्यादित आहे. युवानेते आणि राष्ट्रवादीचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या रोहित पवार यांना त्यांच्याच कर्जत-जामखेड मध्ये पुढची निवडणूक तितकी सोपी नसणार आहे. शिवसेनेची झाली त्यापेक्षा राष्ट्रवादीची हानी खूप मोठी आहे. उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे तशी शरद पवार यांना सहानुभूती कितपत मिळेल याबद्दल शंका आहे कारण अजित पवार गटाने केलेला हल्ला शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर केलेला आहे.

टीप-सध्याचं चाललेलं राजकारण सामान्य माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडले आहे.जास्त विचार करू नये अन्यथा दिगू टिपणीससारखी भ्रमिष्ट होण्याची वेळ येईल.

SendShareTweet
Previous Post

आझाद मैदानावरील मराठा आंदोलनात तुळजापूरकर सहभागी

Next Post

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ.मीना जिंतूरकर; इतिहासात प्रथमच महिलांच्या हाती ‘रोटरी’ची धुरा

Related Posts

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025
Next Post

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ.मीना जिंतूरकर; इतिहासात प्रथमच महिलांच्या हाती 'रोटरी'ची धुरा

ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू; मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीचा प्रस्ताव?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भावी सरपंचाच्या स्वप्नांना ब्रेक ; ६२१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुन्हा होणार

July 5, 2025

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group