• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 20, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

निघाले परतीचे वारकरी,
कथले आघाडी ठरली
६० हजार मनसबदारी…

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 1, 2023
in मराठवाडा
0
0
SHARES
217
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

शाम जाधवर । कळंब
आषाढी एकादशी आणि पंढरपूर म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची याची देही याची डोळा जगण्याची आणि अनुभवण्याची वारी.
वारीला निघणारे भाविक आणि त्यांची मनोभावे सेवा करणारे सेवेकरी हे गणित संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. वारकर्यांची सेवा करण्यात आपला महाराष्ट्र धर्म जपणारे असंख्य भाविक आणि सेवेकरी आपण पावलोपावली अनुभवतो. भले आपण पंढरी च्या वारीला गेलो नाही परंतु वारकऱ्यांची सेवा करून आपणही पुण्य कमवू अशी प्रामाणिक आशा प्रत्येक सेवेकरी बाळगतो आणि आपापल्या परीने घडणारी सेवाही देतो.
वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र कोठेही कमी पडत नाही, परंतु आषाढी एकादशीची वारी संपली कि, सगळ्यांना या वारकर्यांचा विसर पडतो हेही खरे.
पंढरीच्या विठू रायाला भेटण्यासाठी पै-पै जमा करून निघालेला गरीब कष्टकरी वारकरी परतीच्या प्रवासात मात्र मिळेल त्या वाहनाने आणि उपाशीपोटी घर जवळ करण्याच्या प्रयत्नात असतो. भले खिशात पैसे कमी असतील, जाताना खाण्याची भ्रांत असेल, तरीही हा वारकरी उपाशी पोटी निघतो पण विठू रायाला भेटून झालेला आनंद त्याला पोटाची भूकही विसरायला भाग पाडतो.
खरी गोष्ट सुरु होते ते इथेच, कळंब मधील कथले आघाडी त्यांच्या आणि उपाशी पोटाच्या मध्ये येते. आषाढी वारी करून निघालेल्या या माउलींच्या प्रत्येक गाडीला कळंब मध्ये अडवले जाते, हक्काने त्यांना मोफत अन्नछत्रा कडे नेले जाते, आणि त्या परतीच्या प्रवास करणाऱ्या माउलींना पोट भरून जेऊ घालूनच परतीच्या प्रवासाला सोडले जाते.
गेली ३ वर्षे हा उपक्रम अवितरत सुरु आहे हे विशेष.
मागच्या वर्षी कमी पडलेल्या उणीवा लक्षात ठेवून त्यावर चांगले काम करून जास्तीत जास्त माउलींना म्हणजेच परतीच्या वारकऱ्यांना मोफत अन्न छत्र देण्याचे काम याही वर्षी अत्यंत उत्साहात पार पडले. गर्दीचा उचंक मोडत काढून या वर्षी चक्क ६० हजार वारकर्यांना परतीच्या प्रवासात मोफत अन्न छत्र देण्याचा अनोखा विक्रम कळंब मधील स्व. गणपतराव कथले आघाडीच्या वतीने करण्यात आला.
एवढ्या मोठ्या भाविकांना मोफत अन्न छत्र पुरवणे आणि त्यांची मनोभावे सेवा करणे एकट्या दुकट्याचे काम नक्कीच नाही.
यासाठी संपूर्ण कळंबकरानी खारीचा वाटा उचलला. डॉक्टर, वकील, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विध्यार्थी, सेवाभावी संस्था, भजनी मंडळ, पत्रकार, राजकारणी असे असंख्य सेवेकरी आपले स्वतःचे काम असल्याप्रमाणे काम करत होते. कळंब मार्गाने जाणाऱ्या विदर्भ असो कि जालना, परळी, परभणी अशा विविध ठिकाणी वारकर्यांना घेऊन जाणाऱ्या ट्र्क, टेम्पो, बस अशा प्रत्येक वाहनाला हक्काने अडवून त्यांना पोटभर जेऊ घालूनच सोडले गेले. कळंब बस स्थानकामध्ये हा सोहळा पार पडला. पुरी भाजी, मसाला भात अशा खमंग आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन प्रत्येक माउली आनंदाचा ढेकर देऊनच परतीच्या वाटेने मार्गस्थ झाली.

९ क्विंटल गहू, १० क्विंटल तांदूळ, ४ क्विंटल बटाटे, १५ किलोचे २० तेल डबे एवढी लागली सामुग्री

सकाळी ४ वाजता सुरु झालेला हा सेवेचा उपक्रम रात्री ८ वाजेपर्यंत अवितरत चालला

या अन्न छत्रा दरम्यान एक भावनिक गोष्टही घडली – पंढरीच्या विठुरायाला मन भरून पाहिलेल्या आणि या अन्नछत्रामुळे समाधानी झालेल्या २ वृद्ध महिला आयोजकाकांडे आल्या आणि आमच्यासाठी कळंब हे दुसरे पंढरपूर झाले आहे, तिथे गेल्यावरही पोटाची चिंता नाही आणि परतीच्या प्रवासातही तुमच्यामुळे काळजी नाही अशा भावना व्यक्त केल्या.

SendShareTweet
Previous Post

Buldhana Bus Accident : अपघात कशामुळे झाला बस चालक दानिश शेखचा मोठा दावा

Next Post

Buldhana Bus Accident : त्या अपघातग्रस्त बसने वाहतूकीचे नियम तुडवले पायदळी, या कारणांमुळे गेला 25 जीवांचा बळी

Related Posts

यशाचा चढता आलेख; धाराशिवच्या श्री.सिद्धिविनायक परिवाराचे आता विमा क्षेत्रातही पाऊल, सर्व प्रकारचा विमा काढता येणार

January 2, 2024

Dharashiv-Tuljapur Railway नववर्षारंभी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा..! पहिल्या टप्प्यात 30 किलोमीटरचे काम, सांजा, वडगाव, तुळजापूर स्टेशन

December 9, 2023

जिल्ह्यातील १५ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून योजना कार्यान्वित

November 19, 2023

आरक्षणाचा लढा पेटला, उपसरपंचाने दिला राजीनामा; आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री, मुद्दा तापणार

October 25, 2023

शाश्वत पाणी, रोजगार आणि सकारात्मक विचार, या त्रिसूत्रीवर भर देणार; नागरी सत्कारानंतर आमदार राणा पाटील यांचे प्रतिपादन

October 1, 2023

बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

September 30, 2023
Next Post

Buldhana Bus Accident : त्या अपघातग्रस्त बसने वाहतूकीचे नियम तुडवले पायदळी, या कारणांमुळे गेला 25 जीवांचा बळी

पेरण्या खोळंबल्या;शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

May 19, 2025

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group