• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 8, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Farmer’s News गेल्यावर्षी पीक विमा नाही, यावर्षी अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले; प्रचंड नुकसान,तरीही धाराशिव जिल्ह्यावर अन्याय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 7, 2024
in Arambh Marathi Special
0
0
SHARES
2.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेजारच्या लातूरसह बीड, परभणी जिल्ह्याला शासनाकडून नुकसानीची मदत जाहीर झाली आहे. मात्र, प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही धाराशिव जिल्ह्याला मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी पीक विम्यापसून जिल्ह्यातील शेतकऱ्याना केंद्राच्या परिपत्रकामुळे वंचित राहावे लागले होते. दरम्यान,विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते, अशावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीचे काय, जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी यावर गप्प कसे, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनसह अन्य पिकांची अपिरिमित हानी झाली आहे.मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही प्रयत्न करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे.

मदतीपासून जिल्हा का वगळला ?
महसूल आणि कृषी विभागाच्या बेपर्वाईमुळे धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली नाही. धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊनही शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. शुक्रवारी (दि.६) झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारने शेजारच्या लातूर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ३८४ कोटींची तरतूद केली. परभणी जिल्ह्यासाठी ५४८ कोटी तर बीड जिल्ह्यासाठी ५४ कोटींची तरतूद केली. या बैठकीत बीड, लातूर, परभणीसह सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झालेल्या सात जिल्ह्यांना सरकारने ९९७ कोटींची तरतूद केली. परंतु धाराशिव जिल्ह्यातील पंचनाम्याच्या अहवाल आणि निधी मागणीचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्यामुळे या बैठकीत धाराशिव जिल्ह्यासाठी नुकसान होऊनही मदत जाहीर करण्यात आली नाही. छत्रपती संभाजी नगर,लातूर, बीड व परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांनी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव ३० सप्टेंबर रोजीच शासनाकडे सादर केला होता. तर धाराशिव जिल्ह्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीच्या दिवशी म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली.

महसूल व कृषी विभागाच्या दिरंगाईचा फटका
महसूल आणि कृषी विभागाच्या दिरंगाईचा फटका जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला आहे. धाराशिव जिल्ह्यात ३१ ऑगस्ट , १ व २ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी जिल्ह्यातील एकूण १६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. महसूल व कृषी विभागाने ३ व ४ सप्टेंबर रोजी काही भागात नुकसानीचे पंचनामे केले होते. १६ मंडळात अतिवृष्टी होऊनही केवळ ६ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे, असा दावा कृषी विभागाने केला होता. वास्तविक त्यावेळी १६ मंडळातील ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचे वेळेत पंचनामे पूर्ण करून मदतीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम जलद गतीने व्हायला हवे होते परंतु ते झाले नाही. सप्टेंबर महिन्यात नंतरही जवळपास १४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परंतु त्याचेही पंचनामे वेळेत पूर्ण केले नाहीत.

प्रशासनाचे वराती मागून घोडे
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांनी वेळेत पंचनामे पूर्ण करून शासनाकडे ३० सप्टेंबर रोजीच मदतीचे प्रस्ताव सादर केले होते. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्यामुळे मागील आठवड्यात कॅबिनेटच्या तीन बैठका झाल्या यामध्ये आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला मंजुरी देऊन निधी वितरित करण्याचे निर्णय घेण्यात आले. धाराशिव जिल्ह्याचा प्रस्ताव उशिरा गेल्यामुळे जिल्ह्यासाठी निधीची तरतूद केली नाही.

२२१ कोटींचा प्रस्ताव पण आचारसंहितेची भीती

उशिरा प्रस्ताव सादर करून जिल्हा प्रशासनाने राज्याकडे २२१ कोटींची मदत मागितली आहे. जवळपास पावणे दोन लाख शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. परंतु पुढील आठवड्यात कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे धाराशिव जिल्हा अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar #dharaahiv
SendShareTweet
Previous Post

Tuljabhavani Temple आई राजा उदो-उदोच्या जयघोषात घटस्थापना, तुळजापुरात नवरात्रोत्सवास प्रारंभ

Next Post

Breaking तलावाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेलेला युवक गेला वाहून, उशिरापर्यंत शोध कार्य सुरूच,तपास लागेना

Related Posts

भूर्दंड वाढला: धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ओपीडी शुल्क दुप्पट, उद्यापासून रक्त,सोनोग्राफीसह सर्व तपासणी शुल्कात वाढ

May 6, 2025

ऊर्जा मावळली: पेमेंट केलेल्या 17 हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळेना

March 21, 2025

धाराशिव जिल्ह्यातील बारापैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद

March 12, 2025

शेतकऱ्यांच्या संकटात भर, जिल्ह्यात 10 ते 12 बिबट्यांचे वास्तव्य, वन विभागाचा दावा

February 23, 2025

अनुदान कधी मिळणार?

February 16, 2025

धाराशिव जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यामध्ये २३ लाख टन ऊसाचे गाळप

February 13, 2025
Next Post

Breaking तलावाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेलेला युवक गेला वाहून, उशिरापर्यंत शोध कार्य सुरूच,तपास लागेना

..अखेर जिजाऊ चौकासाठी पोलिस चौकी मंजूर, अप्पर पोलीस महासंचालकांचे आदेश, तत्कालीन आमदार सुरेश धस यांनी केला होता पाठपुरावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

दारू प्यायली म्हणून दहिवडी येथे बापानेच केला मुलाचा खून

May 7, 2025

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर शिखर समितीची मान्यता

May 6, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group