• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 20, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मेळघाटातली ‘कोवळी पानगळ’ कधी थांबणार?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 1, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
22
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


जयंत सोनोने, अमरावती

झाडांच्या गर्द राईने नटलेला, नागमोडी घाट वळणांनी सजलेला, प्रदूषणापासून कोसो दूर असलेला, वाघांचं नंदनवन मानला जाणारा अमरावती जिल्ह्यातला मेळघाटचा परिसर. मेळघाट मध्यप्रदेशाला लागून असल्याने आणि चिखलदऱ्यासारखे हिलस्टेशन तिथंच असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंग्रजांचेही हे लाडके ठिकाण होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बांधलेली काही विश्रामगृहं आजही चिखलदऱ्यात सुस्थितीत आहेत. अनेक आदिवासींचे मूळ निवासस्थान असलेलं हे शांत निवांत मेळघाट. पण मेळघाट म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी न आठवता दुर्दैवाने सगळ्यात आधी आठवतो तो शब्द म्हणजे- ‘कुपोषण’. मेळघाट कुप्रसिद्ध झालाय तो डॉ. अभय बंग यांच्या शब्दांत कोवळ्या पानगळीसाठी- अर्थात बालमृत्यूंसाठी.

१९९२ साली पत्रकार अनिल कुचे यांनी मेळघाटातील काही बालके एका गंभीर आजाराशी लढा देत असल्याची बातमी प्रकाशित केली. पुढे या बातमीवर अनेक चर्चा झडल्या, तज्ज्ञ डॉक्टर्स, शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या अभ्यासातून- हा आजार म्हणजे कुपोषणच असल्याचे शिक्कामोर्तब तत्कालीन जिल्हाप्रशासनाने केले. आणि बघता बघता राज्य, राष्ट्रीय व पुढे आंतराष्ट्रीय स्तरावर कुपोषण या विषयाची चर्चा गाजू लागली, उपाययोजना दृष्टिपथात येऊ लागल्या. आरोग्य विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, अभ्यासक, शासकीय कर्मचारी यांनी मेळघाट अक्षरश: पिंजून काढला. बालमृत्यूंबाबतची नेमकी वस्तुस्थिती समजावी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ‘सर्च’ चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात बालमृत्यूदर मोजण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्यात मेळघाटसह महाराष्ट्राच्या तेरा विभागांमधल्या 231 गावांमध्ये आणि शहरी भागातील सहा गरीब वस्त्यांमध्ये सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरचा संशोधन अहवाल नोव्हेंबर 2002 मध्ये ‘कोवळी पानगळ’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आला. या अभ्यासाचा प्रमुख निष्कर्ष हा होता की दरवर्षी महाराष्ट्रात सरासरी दोन लाख बालमृत्यू होतात, पण महाराष्ट्राचा आरोग्य विभाग त्यातील केवळ 20 टक्के मृत्यूंचीच नोंद करतो.

न्यायालयाने घेतली दखल

ही आकडेवारी थरकाप उडवणारीच होती. म्हणजे किती तरी बालकांच्या मृत्यूची साधी नोंदही सरकारदरबारी होत नाही?!! याच बालमृत्यूसंबंधातल्या कार्यात आमच्या ‘संपर्क’ संस्थेचाही खारीचा वाटा आहे. गडचिरोलीतील बालमृत्यूंबाबत ‘संपर्क’ संस्थेचे हेमंत कर्णिक यांचा एक लेख मुंबईतल्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला आणि त्याची दखल 2003 साली चक्क मुंबई उच्च न्यायालयाने स्यू मोटो केसद्वारे घेतली आणि तत्कालीन राज्य सरकारला या बालमृत्यूंबाबत जाब विचारला. या सगळ्यात पुढं शासन- प्रशासनाला आदेश दिले गेले, काही समित्यांची नेमणूकही झाली. त्यात डॉ. अभय बंग आणि टीमसोबत संपर्क संस्थेचाही सल्ला घेतला गेला. कुपोषण आणि बालमृत्यू हे अतिशय गांभिर्याने घेण्याचीच गोष्ट आहे, हे संपर्क संस्था तेव्हापासून ठसवत आलेली आहे. या आठवड्यातली हे लेखमालासुद्धा त्याच जागरूक प्रयत्नांचा एक भाग आहे.

दरवर्षी 300 बालकांचा अकाली मृत्यू

माध्यमांची जनजागृती, स्वयंसेवी संस्थांचा पाठपुरावा या सगळ्यातून कुपोषण आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्‍य शासनाकडून जननी-शिशू सुरक्षा योजना, ग्राम बालविकास केंद्रे, जीवनसत्त्वपुरवठा, जंतनाशक मोहीम, आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र, भरारी पथक योजना, लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अशा डझनांहून अधिक योजना अस्तित्वात आहेत. मात्र तरीसुद्धा मेळघाटात दरवर्षी सुमारे 200 ते 300 बालके मृत्यूच्या दारात अकाली का ढकलली जात आहेत, हा कळीचा प्रश्न आहे.

1999 पासून आतापर्यंत 10 हजार बालमृत्यू

आपण बालमृत्यूंच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीकडे एक नजर टाकूयात. मेळघाटात 1999 पासून आत्तापर्यंत दहा हजारांच्या जवळपास बालमृत्यू झालेत. 2009-10 या वर्षात शून्‍य ते सहा वर्षे वयोगटातील 570 बालमृत्‍यूंची नोंद झाली होती. 2013-14 पर्यंत त्‍यात घट होऊन बालमृत्‍यू 338 पर्यंत आले. 2015-16 मध्‍ये तर केवळ 283 बालमृत्‍यूंची नोंद झाली होती. पण 2016-17 मध्‍ये पुन्‍हा 407 बालमृत्‍यू झाले. ही धोक्‍याची घंटा होती. 2018-19 मध्‍ये 309, 2019-20 मध्‍ये 246, 2020-21 मध्‍ये 213, 2021-22 मध्‍ये 195 तर एप्रिल 2022-मार्च 2023 या कालावधीत सुमारे 175 बालमृत्यू एकट्या मेळघाटात झालेले आहेत. एवढंच नाही तर 71 उपजत बालमृत्यूंची नोंदही यावर्षी आहे. मात्र हे सगळे बालमृत्यू फक्त कुपोषणाने नसून इतर रोग, इन्फेक्शन्स याची परिणती बालमृत्यूत झाल्याची सारवासारव जिल्हा प्रशासन करतंय. इतक्या योजना, माध्यमांची जनजागृती, मेळघाटात मुक्काम ठोकून असणाऱ्या स्वयंसेवी संस्था हे सगळं असूनही, पहिला बालमृत्यू उघडकीस येऊन तीन दशके होऊनही अद्यापही बालमृत्यूंचा आकडा का घटत नाहीए, हा काळजीत टाकणारा सवाल आहे.

SendShareTweet
Previous Post

महाराष्ट्रासाठी आजची पहाट धक्कादायक, २५ जणांचा क्षणात होरपळून मृत्यू

Next Post

Buldhana Bus Accident : अपघात कशामुळे झाला बस चालक दानिश शेखचा मोठा दावा

Related Posts

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025

Tuljapur Drugs तुळजापूर श्रद्धेचं, भक्तीचं, अस्मितेचं प्रतीक..ड्रग्स प्रकरणात सत्य शोधा, बदनामी नको; तुळजापूरच्या कन्येचं माध्यमांना आवाहन

April 12, 2025

Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

March 29, 2025

कसली ही थट्टा..? 500 बेडचे रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रत्येकी एक हजाराची तरतूद

March 16, 2025
Next Post

Buldhana Bus Accident : अपघात कशामुळे झाला बस चालक दानिश शेखचा मोठा दावा

निघाले परतीचे वारकरी,
कथले आघाडी ठरली
६० हजार मनसबदारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

May 19, 2025

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group