• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 20, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Farmer’s News आचारसंहितेत अडकलेल्या मदतीच्या प्रस्तावांना अखेर मंजुरी, शेतकऱ्यांची दिवाळी गोड; अतिवृष्टीच्या नुकसानीचे 313 कोटी मंजूर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 30, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
948
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आचारसंहितेत अडकलेल्या मदतीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांची मंजुरी,
–
2019 मध्येही आचारसंहितेत मुख्य सचिवांनी घेतला होता असाच निर्णय,

दैनिक आरंभ मराठीने उपस्थित केली होती शेतकऱ्यांची समस्या

सज्जन यादव / आरंभ मराठी

धाराशिव; सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महसूल आणि कृषी विभागाने त्याचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाला सादर केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मदतीचा हा प्रस्ताव तसाच पडून राहिला होता. या प्रस्तावाला राज्याच्या मुख्य सचिवांनी मंजुरी दिली असून, धाराशिव जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने या नुकसान भरपाईचे वितरण करण्यास मंजुरी दिली तर धाराशिव जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना 313 कोटी रुपये मिळणार आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी असून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी ‘दैनिक आरंभ मराठी’ने सातत्याने हा विषय लावून धरला होता.

2019 मध्येही निर्माण झाली होती अशीच परिस्थिती

पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यपालांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला विनंती करून शेतकऱ्यांना 5 हजार 800 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. मुख्य सचिवांनी मान्यता दिल्यामुळे आता जवळपास दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2200 कोटी रुपयांचे वितरण होणार आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. धाराशिव जिल्हा देखील 57 पैकी जवळपास 33 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. नुकसान झालेल्या जिल्ह्यांना 30 सप्टेंबर पूर्वी नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाला अहवाल सादर करावा असा आदेश सरकारने दिला होता. लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यांनी लवकर अहवाल दिल्यामुळे त्यांना कॅबिनेटच्या शेवटच्या बैठकीत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.

धाराशिवचा उशिरा प्रस्ताव गेल्यामुळे मिळाली नव्हती मंजुरी

परंतु धाराशिव जिल्ह्याचा प्रस्ताव 4 ऑक्टोबर रोजी सादर झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्याला कॅबिनेटच्या बैठकीत मदत मंजूर झाली नव्हती. 15 ऑक्टोबर रोजी राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यासह इतर 10 जिल्ह्यांचा प्रस्ताव आचारसंहितेत अडकून पडला होता. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याचा 233 कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव सचिवांना पाठवला होता.

10 जिल्ह्यांच्या प्रस्तावांना दिली मंजुरी

पुढे तो मंजूर होण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाली होती. आता राज्याच्या मुख्य सचिवांनी आचारसंहितेत अडकलेले मदतीचे सर्व प्रस्ताव मंजूर केले आहेत. राज्य शासनाने यापूर्वी अतिवृष्टीच्या अनुदानापोटी सात जिल्ह्यांसाठी 997 कोटींची मदत जाहीर केली आहे. सोमवारी मुख्य सचिवांनी जवळपास दहा जिल्ह्यांच्या 2200 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

निवडणूक आयोगाला पत्र, मंजुरीनंतर वाटप होणार

मुख्य सचिवांनी मदतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असली तरी त्याचे वाटप करण्याचे अधिकार मुख्य सचिवांना नाहीत. सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे या निधीचे वाटप करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागावी लागेल. अशी परवानगी सचिवांनी आयोगाकडे मागितली असून निवडणूक आयोगाने निधी वितरणास परवानगी दिली तर पुढच्या काही दिवसात नुकसान भरपाईची ही मदत शेतकऱ्यांना मिळू शकते.

३१३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर त्यांचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने ४ ऑक्टोबर रोजी २२१ कोटींची मदत मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. जवळपास पावणे दोन लाख शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रस्तावात नमूद केले होते. या प्रस्तावातून लोहारा, उमरगा, तुळजापूर व भूम या चार तालुक्यांना वगळण्यात आले होते. परंतु या चारही तालुक्यात नुकसान झाले असल्यामुळे प्रशासनाने आणखी एक प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला. त्यानुसार लोहारा, उमरगा, तुळजापूर व भूम या तालुक्यातील ६६ हजार ७७४ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी आणखी ९२ कोटी ८२ लाख रुपयांची मदत शासनाकडे मागितली. अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ८४१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल एकूण ३१३ कोटी रुपयांची मदत शासनाकडे मागितली आहे. आता यापैकी २२१ कोटींची फक्त पहिला प्रस्ताव मान्य होतो की, नंतर दिलेला ९२ कोटींचाही प्रस्ताव मान्य होतो हे पहावे लागेल.
आचारसंहितेत अडकलेला हा प्रस्ताव आता मंजूर झाला असून, शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar
SendShareTweet
Previous Post

Big Breaking कैलास पाटलांच्या विरोधात धनुष्यबाण घेऊन अजित पिंगळे मैदानात; उमेदवारी जाहीर

Next Post

Manoj jarange Patil शपथेवर सांगतो.. जरांगे-पाटील देतील त्याच उमेदवाराला निवडून आणू..धाराशिवमध्ये इच्छूक उमेदवारांनी दिलेले शपथपत्र पोहोचले मनोज जरांगे पाटलांकडे

Related Posts

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025

Tuljapur Drugs तुळजापूर श्रद्धेचं, भक्तीचं, अस्मितेचं प्रतीक..ड्रग्स प्रकरणात सत्य शोधा, बदनामी नको; तुळजापूरच्या कन्येचं माध्यमांना आवाहन

April 12, 2025

Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

March 29, 2025

कसली ही थट्टा..? 500 बेडचे रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रत्येकी एक हजाराची तरतूद

March 16, 2025
Next Post

Manoj jarange Patil शपथेवर सांगतो.. जरांगे-पाटील देतील त्याच उमेदवाराला निवडून आणू..धाराशिवमध्ये इच्छूक उमेदवारांनी दिलेले शपथपत्र पोहोचले मनोज जरांगे पाटलांकडे

तेच ठिकाण,तोच नेता, तीच गर्दी: मनोज जरांगे-पाटील पुन्हा गाजवणार सभा

Big Breaking धाराशिवसह भूम-परंडा मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याचा निर्णय, तुळजापूरबाबत थोड्या वेळातच निर्णय

ताज्या घडामोडी

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

May 19, 2025

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group