• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 26, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुष्टचक्र कायम ; वर्षभरात १५२ शेतकऱ्यांनी स्वतःला संपवले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 7, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
80
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबेना

तीन वर्षात कर्जबाजारीपणामुळे ४४० शेतकऱ्यांची आत्महत्या

सज्जन यादव /आरंभ मराठी

धाराशिव

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या धाराशिव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यात शासन व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या नोंदणीनुसार मागच्या तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले. यामध्ये २०२४ या एकाच वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १५२ एवढी आहे.

विशेष म्हणजे २०२४ या वर्षात मराठवाड्यात बीड आणि नांदेड नंतर धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेजारच्या लातूर जिल्ह्यात वर्षभरात ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर धाराशिवची संख्या लातूरपेक्षा दुप्पट आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता यवतमाळ नंतर शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या धाराशिव जिल्ह्यात झाल्या आहेत.

कर्जबाजारीपणा, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांमुळे शेतकऱ्यांचे मनोबल दिवसेंदिवस कमजोर होत असून, शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शासन-प्रशासनासह राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ पर्यंत धाराशिव जिल्ह्यात तब्बल ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.सततची नापिकी, हाती येणाऱ्या उत्पन्नाला बाजारपेठेत न मिळणारा समाधानकारक भाव, उभ्या पिकांची वन्यप्राण्यांकडून होणारी नासाडी, तर कधी गारपीट, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावले जात आहे.

त्यातून कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत. मध्यंतरी शासनाच्या वतीने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला होता. परंतु शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडून न घेता खाजगी सावकारांकडून आणि पतसंस्थेकडून घेतलेली असल्यामुळे कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यातून सुटले नाहीत.

शेती करत असताना शेतकऱ्यांना हजारो समस्यांचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वाढलेल्या किमती व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्या तुलनेत शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी व झालेल्या उत्पन्नाला मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडत चालले आहे. शेतकरी आर्थिक गर्तेत अडकत असल्यामुळे आर्थिक टंचाईतून आत्महत्यांचे हे सत्र वाढत असल्याचे दिसते.

वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे धाराशिव जिल्ह्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नकोशी ओळख शासनदरबारी होत आहे. शेती व शेतीपूरक उद्योगांसाठी धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगले असले तरी शासन स्तरावरून अपेक्षित प्रयत्न केले जात नसल्यामुळे फक्त आणि फक्त शेतीवरच इथली संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून राहत आहे.

३३२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत

सन २०२२ ते २०२४ या तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर २०२४ या एका वर्षात १५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तीन वर्षातील ४४० पैकी ३३२ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरवित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

तर ५२ प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. ५६ प्रकरणे निर्णयासाठी प्रलंबीत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येते.

मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्नही गंभीर

धाराशिव जिल्ह्यात उत्पन्नाचे एकमेव साधन शेती हेच आहे. त्यामुळे मुला-मुलींच्या लग्नाचा देखील गंभीर प्रश्न पालकांना सतावत आहे.

शेतकऱ्यांचे दुःख माहीत असल्यामुळे आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायचीच नाही अशी मानसिकता बनल्यामुळे मुलीचे शहरातल्या शेती न करणाऱ्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण बनले आहे.

आर्थिक विवंचनेसोबतच मुला-मुलींच्या लग्नाची चिंता देखील शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे आत्महत्येचा टोकाचा निर्णय शेतकरी घेत आहेत.

तीन वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी

वर्ष – शेतकरी आत्महत्या
२०२२ – ११७
२०२३ – १७१
२०२४ – १५२
एकूण – ४४०

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली मदत

वर्ष – आत्महत्या – मदतीस पात्र – अपात्र – प्रलंबित

२०२२ – ११७ – १०२ – १५ – ००
२०२३ – १७१ – १४३ – २८ – ००
२०२४ – १५२ – ८७ – ९ – ५६
एकूण – ४४० – ३३२ – ५२ – ५६

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #osmanabad#dharashiv#farming#suicide
SendShareTweet
Previous Post

Big Breaking गोळीबारातून एकाचा मृत्यू, एकजण जखमी

Next Post

सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी आक्रमक, पणन अधिकाऱ्याला घेराव

Related Posts

कारच्या धडकेत नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

June 25, 2025

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीत पुन्हा राडा; बाधित शेतकऱ्याने घेतले विष

June 25, 2025

जबरदस्तीने भूसंपादनः शेतकऱ्यांनी रोखली शक्तीपीठ महामार्गासाठीची संयुक्त मोजणी

June 25, 2025

तेरा वर्षीय बालिकेवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

June 24, 2025

मुलींच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नसल्याने डकवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

June 24, 2025

पोलिसांमध्ये क्रूरता संचारली; पवनचक्की कंपनीला मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

June 22, 2025
Next Post

सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी आक्रमक, पणन अधिकाऱ्याला घेराव

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ अशक्यच, कारण..गोदामे फुल्ल झाली, जागेअभावी खरेदी बंद: आता तूर, हरभऱ्याच्या खरेदीसाठी नियोजन

ताज्या घडामोडी

कारच्या धडकेत नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

June 25, 2025

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीत पुन्हा राडा; बाधित शेतकऱ्याने घेतले विष

June 25, 2025

जबरदस्तीने भूसंपादनः शेतकऱ्यांनी रोखली शक्तीपीठ महामार्गासाठीची संयुक्त मोजणी

June 25, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group