• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 8, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यामध्ये २३ लाख टन ऊसाचे गाळप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 13, 2025
in Arambh Marathi Special
0
0
SHARES
131
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

१५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

ऊस गाळपात नॅचरल शुगर तर साखर उताऱ्यात कंचेश्वर कारखाना अग्रेसर

सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी
तेर –
धाराशिव जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यामध्ये दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ अखेर एकूण २३ लाख २७, हजार ६३मे. टन ऊसाचे गाळप झाले असून, त्यामधून १५ लाख १६ हजार ३७१ क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे.

रांजणीच्या नॅचरल शुगरने सर्वात जास्त गाळप व साखर उत्पादन घेऊन जिल्ह्यात बाजी मारली. गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारे साखर कारखाने यावर्षी विधानसभा निवडणुकीमुळे तीन आठवडे उशिरा सुरू झाले होते. त्यातच यावर्षी ऊसाचे प्रमाण अतिशय नगण्य असल्यामुळे साखर कारखान्यासमोर गाळप हंगाम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते.

तरीही जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडला. सध्या काही कारखाने बंद झाले आहेत, तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील ५ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांनी गाळप हंगामात आतापर्यंत एकूण २३ लाख २७ हजार ६३ टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यामधून १५ लाख १६ हजार ३७१ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रीज रांजणी या कारखान्याने ४ लाख ११ हजार ६०० टन ऊस गाळप करून जिल्ह्यात आघाडी घेतली. नॅचरलने आतापर्यंत ३ लाख ७२ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन काढले तर साखर उतारा ९.१४ राहिला आहे.

जिल्ह्यातील सर्वात जास्त ११.१६ टक्के साखर उतारा असलेल्या कंचेश्वर शुगर मंगरूळ या कारखान्याने २ लाख २० हजार १६० टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून २ लाख ४३ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन केले. भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने १ लाख १९ हजार ५५ टन ऊस गाळप करून, ८० हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन केली. मुरूम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याने १ लाख ८२ हजार २१५ टन ऊस गाळप करून १ लाख ८० हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत २ लाख ३ हजार ३८४ टन ऊस गाळप करून एकूण १ लाख ७८ हजार ५० क्विंटल साखर उत्पादन काढले.

भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याने ९९ हजार ३६५ टन ऊस गाळप करून ८९ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील क्विनर्जी इंडस्ट्रीज भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने ४ लाख २ हजार ७९० टन ऊसाचे गाळप करून १ लाख १२ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन काढले. या साखर कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे,

परंडा तालुक्यातील ईडा जवळा येथील आर्यन मल्टीस्टेट एलएलपी बाणगंगा कारखान्याने ३ लाख ४ लाख ७३४ टन ऊस गाळप केला. तर वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिलने ५८ हजार ५०० टन ऊस गाळप केला त्यामधून ४९ हजार ५५१ क्विंटल साखर तयार झाली. कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने १ लाख ५ हजार ५२० टन ऊस गाळून त्यातून ८७ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादित केली.

परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने १ लाख ३२ हजार ९९० टन ऊसातून ६५ हजार क्विंटल साखर काढली. लोहारा तालुक्यातील खेड येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या कारखान्याने ८६ हजार ७५० टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून ५७ हजार ७२० क्विंटल साखर काढली.

प्रतिकूल परिस्थितीत २३ लाख टन ऊसाचे गाळप
धाराशिव जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी एकूण १० लाख ६ हजार ८०९ टन ऊस गाळप करून ६ लाख ४० हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन घेतले. तर खाजगी साखर कारखान्यानी १३ लाख २० हजार २५४ टन ऊस गाळप केला व त्यामधून ८ लाख ७६ हजार ६४ क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

एकंदरीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अंत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही २३ लाख २७ हजार ६३ टन ऊसाचे गाळप करून १५ लाख १६ हजार ३७१ क्विंटल साखर उत्पादन घेतले.

गाळप हंगाम दोन आठवडे चालणार
सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या ढोकी येथील तेरणा साखर कारखाना ३ फेब्रुवारी रोजी बंद झाला आहे. तर केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना ५ फेब्रुवारी रोजी बंद झाला आहे. इतर कारखाने फेब्रुवारी अखेरपर्यंत बंद होणार असून गाळप हंगामाची फेब्रुवारी महिन्यातच सांगता होणार आहे.
Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #osmanabad#dharashiv#sugar
SendShareTweet
Previous Post

नेम चुकला, वाघाने पुन्हा दिला चकवा

Next Post

जिल्ह्यातील पाच हजार लाडके भाऊ सहा महिन्यांनी पुन्हा बेकार

Related Posts

भूर्दंड वाढला: धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ओपीडी शुल्क दुप्पट, उद्यापासून रक्त,सोनोग्राफीसह सर्व तपासणी शुल्कात वाढ

May 6, 2025

ऊर्जा मावळली: पेमेंट केलेल्या 17 हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळेना

March 21, 2025

धाराशिव जिल्ह्यातील बारापैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद

March 12, 2025

शेतकऱ्यांच्या संकटात भर, जिल्ह्यात 10 ते 12 बिबट्यांचे वास्तव्य, वन विभागाचा दावा

February 23, 2025

अनुदान कधी मिळणार?

February 16, 2025

धाराशिव जिल्ह्यातील चार लाख लाभार्थी महिलांपैकी फक्त दहा लाडक्या बहिणींनी लाभ सोडला

February 11, 2025
Next Post

जिल्ह्यातील पाच हजार लाडके भाऊ सहा महिन्यांनी पुन्हा बेकार

७० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने अचानक घेतला पेट

ताज्या घडामोडी

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

दारू प्यायली म्हणून दहिवडी येथे बापानेच केला मुलाचा खून

May 7, 2025

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर शिखर समितीची मान्यता

May 6, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group