• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची लूट; आद्रतेचा निकष लागू होईना,केवळ 13 हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 30, 2024
in कृषी
0
0
SHARES
179
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव: निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करत केंद्र आणि राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना आणि निवडणुकीत महायुतीला होईल असा अंदाज व्यक्त करून हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, या हमीभाव खरेदी केंद्रांवर राजरोसपणे शेतकऱ्यांना लुटले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

शेतकऱ्यांनाकडून केंद्रचालक हमाली आणि चाळणीच्या नावाखाली क्विंटलमागे १०० ते १५० रुपये वसूल करत आहेत. नाफेडकडून खरेदी केंद्रांना क्विंटल मागे ठराविक रक्कम मिळत असतानाही केंद्रचालक मनमानीपणे ही रक्कम वसूल करत असल्याचे दिसत आहे. क्विंटलमागे होणारी लूट, मालाची प्रतवारी ठरवण्याच्या जाचक नियमांमुळे या खरेदी केंद्रांचा शेतकऱ्यांना खरंच काही फायदा होतोय का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

शेतकऱ्याच्या खरीप हंगामातील उत्पादित सोयाबीन मालाची खरेदी करण्यास नाफेड कडून जिल्ह्यातील एकूण १८ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली होती. १ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्रावर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु शेतकरी बांधवांकडून दिवाळीच्या अगोदर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सोयाबीन माल विक्री करून दीपावली सण व रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यात आले. १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणारे खरेदी केंद्र ओलाव्याचे कारण देत २५ ऑक्टोबर पर्यंत सुरू करण्यात आले नाहीत.

दिवाळीसाठी पैशाची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन न विकता कमी पैशात खाजगी व्यापाऱ्यांकडे विकले. दिनांक २८ नोव्हेंबरपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील १८ खरेदी केंद्रावर १३ हजार ३५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु मागील एक महिन्यात फक्त ११३३ शेतकऱ्यांनीच खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री केली. सोयाबीन खरेदीसाठी किचकट अटी आणि नियम लागू केल्यामुळे या खरेदी केंद्रावर शेतकरी माल नेण्यास तयार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्र २५ ऑक्टोबरला सुरू केले.

त्यावेळी पावसाळा लांबल्यामुळे आणि हवेत आर्द्रता असल्यामुळे सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त होते. शासनाच्या नियमानुसार १२ टक्केपेक्षा कमी आर्द्रता असणे बंधनकारक होते. त्यामुळे सुरुवातीच्या दहा दिवसांत म्हणजे ५ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील एकाही केंद्रावर खरेदी झाली नाही. १५ नोव्हेंबरनंतर खरेदीस थोडा वेग आला आहे. ओलाव्याचा निकष १२ टक्के असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकारले गेले. यावर उपाय म्हणून ऐन निवडणुकीत १५ नोव्हेंबर रोजी केंद्रातील शेतकरी कल्याण मंत्रालयाने ओलाव्याचे प्रमाण १५ टक्केपर्यंत ग्राह्य धरण्याचा आदेश काढून खरेदी करावी असे परिपत्रक प्रसिद्ध केले.

परंतु, परिपत्रक काढून पंधरा दिवस झाले तरीही धाराशिव जिल्ह्यातील १८ खरेदी केंद्रावर याचे पालन केले जात नाही. यासंबधी जिल्हा पणन अधिकारी यांना विचारले असता, त्यांनी लिखित स्वरूपात कुठल्याच सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्या नसल्यामुळे हा नियम लागू केला नसल्याचे सांगितले.

किचकट नियमांमुळे शेतकरी नाराज

हमीभाव खरेदी केंद्रांची घोषणा झाल्यावर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु खरेदी केंद्रावरील जाचक अटी आणि नियमांमुळे नोंदणी करणारे शेतकरी देखील माल आणण्यास तयार नाहीत. मालामध्ये थोडीही माती असेल किंवा माल थोडा डॅमेज असेल तर तो खरेदी केंद्रावर नाकारला जात आहे. वास्तविक मालाची व्यवस्थित चाळणी करून माल खरेदी केला जात असतानाही तो का नाकारला जातोय हे शेतकऱ्यांना कळत नाही. हार्व्हेस्टर यंत्राने काढलेला माल काही खरेदी केंद्रावर स्वीकारला जात नाही. नाफेड कडून असा कुठलाही नियम नसताना खरेदी केंद्र चालकांनी मनमानी करत हा नियम लागू केला आहे. मजुरांअभावी शेतकऱ्यांनी यंत्राने काढलेले सोयाबीन नाकारण्याचा नियम कोणी केला? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. या कारणासाठी कित्येक शेतकऱ्यांचा खरेदी केंद्रावर आलेला माल परत पाठवला जात आहे.

हमीभाव ४८९२ रुपये पण अगोदरच १५० रुपये घेतले जातात

सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये आहे. मार्केटमध्ये सध्या सोयाबीन ४ हजार ते ४३०० रुपये क्विंटलने खरेदी केले जात आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर जरी ४ हजार ८९२ रुपये भाव असला तरी खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल १०० ते १५० रुपये शेतकऱ्यांकडून रोखीने वसूल केले जात आहेत. हमाली आणि चाळणी या नावाखाली राजरोसपणे ही वसुली रोखीने जाग्यावरच केली जाते. खरेदी केंद्रांवर नाफेडचे नियंत्रण असूनही ही वसुली सुरू आहे. १८ केंद्रावर काही ठिकाणी क्विंटलला १०० रुपये, काही ठिकाणी १३० तर काही ठिकाणी १५० रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहेत. याशिवाय हमालांकडून चहापाण्याच्या नावाखाली प्रत्येक शेतकऱ्यांकडून दीडशे-दोनशे रुपये काढले जात आहेत.

नियमात बदल पण लागू नाही

सोयाबीन खरेदीसाठी १२ पेक्षा कमी आर्द्रतेचा नियम शासनाने लागू केला होता. परंतु या नियमामुळे खरेदी केंद्रावर माल येत नाही म्हणून दिनांक १५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीचे निकष बदलून ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांऐवजी १५ टक्के केले आहे. परंतु पणन विभागाने लेखी सूचना नाहीत असे कारण देत हा नियम अजूनही लागू केला नाही.
–
जिल्ह्यातील एकूण खरेदी केंद्र – १८
झालेली नोंदणी – १३ हजार ३५७
केंद्रावर माल विकणारे शेतकरी – ११३३
खरेदी केलेले सोयाबीन – २४ हजार ५८६ क्विंटल
खरेदी केलेल्या मालाची एकूण किंमत – १२ कोटी रुपये
शेतकऱ्यांना वितरित केलेली रक्कम – ३ कोटी रुपये

उत्पन्नापेक्षा २ टक्के मालाचीही खरेदी नाही
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये एकूण ४ लाख ६२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यामधून जिल्ह्यात शासकीय आकडेवारी नुसार ७८ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झालेले आहे. जिल्ह्यातील सर्व १८ खरेदी केंद्रांनी दररोज १० हजार क्विंटल जरी माल खरेदी केला तरी पुढच्या चार महिन्यात फक्त १ लाख २० हजार क्विंटल पर्यंत माल खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजे नाफेड कडून जिल्ह्यातील एकूण उत्पन्नाच्या २ टक्के देखील माल खरेदी केला जाऊ शकणार नाही.

आर्द्रतेच्या नियमाचा लेखी आदेश नाही
सोयाबीनमधील आर्द्रता १२ वरून १५ टक्क्यावर नेण्याचा निर्णय जरी केंद्र सरकारने घेतला असला तरी तसे पत्र आम्हाला अजून मिळालेले नाही. वखार महामंडळ हे १२ टक्के आर्द्रता ग्राह्य धरते त्यामुळे त्याच प्रमाणात माल खरेदी करावा लागत आहे. नाफेड कडून बदललेल्या नियमाचे जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत आम्हाला तो निर्णय लागू करता येत नाही.
खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून किती रक्कम घ्यायची यावर आमचे बंधन नाही.
-मनोज कुमार वाजपेयी
जिल्हा पणन अधिकारी

Tags: #cmomaharashtra #eknathshinde #devendraphadanvis #ajitdadapawar #Osmanabad #dharashiv
SendShareTweet
Previous Post

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

Next Post

धाराशिव नगर पालिका भ्रष्टाचार प्रकरण: एसआयटी चौकशीला मुहूर्त मिळेना; तीन महिने उलटले तरी चौकशी सुरु नाही

Related Posts

‘त्या’ बातम्या खोट्या, सोयाबीन खरदीला मुदतवाढ नाहीच !

February 11, 2025

Devendra fadanvis शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका..

December 7, 2024

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

January 9, 2024

शेतकऱ्यांना हक्काचा 294 कोटींचा पीक विमा मिळवून द्या; आमदार कैलास पाटलांनी घेतली कृषी आयुक्तांची भेट

January 3, 2024

375 कोटींच्या पीक विम्यासंदर्भात जानेवारीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

December 29, 2023

नळदुर्गमध्ये स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती करा

December 21, 2023
Next Post

धाराशिव नगर पालिका भ्रष्टाचार प्रकरण: एसआयटी चौकशीला मुहूर्त मिळेना; तीन महिने उलटले तरी चौकशी सुरु नाही

Devendra fadanvis शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका..

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group