• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, December 3, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

स्टेशन रोडची दुर्दशा,नागरिकांच्या संयमामुळे अधिकाऱ्यांच्या भावना बोथट; खासदार-आमदारांनी खडसावल्यानंतर अधिकारी म्हणाले, 31 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करणार, अजून कामाला मुहूर्तच नाही

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 11, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
259
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

नालीच्या कामाचा दर्जा नाही, डांबरी रस्ता उखडला,नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा सुरूच,चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले साडेपाच कोटी खर्च होईनात, विकासाचा वेग कसा वाढणार?

प्रतिनिधी / धाराशिव

शहरातील रेल्वे स्टेशन जिजाऊ नगर रस्त्याची दुर्दशा संपण्याचे नाव घेत नाही. पावसाळ्यात प्रचंड हाल सहन करूनही नागरिकांची समस्या समजू न शकलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भावना बोथट झाल्या आहेत. त्यामुळेच 15 दिवसांपूर्वी खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला कडक शब्दांत सुनावले, तसेच काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार 31 ऑक्टोबर डेडलाईन दिली. ही मुदत संपण्यासाठी 20 दिवस उरले आहेत. मात्र अजून कामाला सुरुवात देखील झालेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींना मुदत देऊनही कामाबद्दल गांभीर्य नसलेले अधिकारी किती निर्ढावले आहेत,याचा अंदाज येतो.

भुयारी गटार योजनेच्या कामामुळे धाराशिव शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. नागरिकांची ओरड झाल्यानंतर आणि माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर काही भागात रस्त्यांची दुरुस्ती झाली. पण दरम्यानच्या काळात पाऊस थांबल्याने नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आणि नगर पालिकेने दुरुस्ती थांबवली.परतीचा मोठा पाऊस झाल्यास नागरिकांचे अजून हाल होणार आहेत. मात्र धाराशिव शहरातील नागरिक अत्यंत संयमी असल्याचा गैरफायदा प्रशासन घेत आहे. किंबहुना या संयमातून नागरिकांना स्वतःच्या हक्कांचा, जाणिवांचा विसर पडत आहे. स्टेशन रोड, जिजाऊ नगर रस्त्यासाठी 4 वर्षांपूर्वी आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नातून साडेपाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.मात्र नगर पालिकेने शहराला जणू विकासाच्या मार्गावर नेणारी भुयारी गटार योजना राबविण्याचा घाट घातला. या योजनेच्या कामामुळे रस्त्याचे काम रखडले होते. हे काम पूर्ण करून 5 महिने झाले तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही. प्रचंड हाल सहन करुनही भावना बोथट झालेल्या नागरिकांचा आवाज बांधकाम विभागापर्यंत पोहोचलाच नाही.निवडक नागरीक आंदोलन,पाठपुरावा करत आहेत, मात्र, उर्वरित नागरिक मुकाटपणे सहन करत खड्ड्याच्या रस्त्यातून मार्ग शोधत आहेत. तर याच संयमाचा अधिकारी आणि ठेकेदार गैरफायदा उठवत आहेत.मार्च महिन्यात रस्ता उखडून टाकण्यात आला होता. अजूनही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. काही नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांनी गेल्या महिन्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची रस्त्याच्या कामासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांची रस्त्यामुळे होणारी समस्या आणि कामातील दिरंगाईबद्दल खडसावल्यानंतर अधिकाऱ्यांनी चुक मान्य करत 31 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत मागितली. 31 तारखेपर्यंत स्टेशन रोडचे काम पूर्ण करण्यात येईल असा शब्द दिला.ही मुदत सप्टेंबर महिन्यात दिलेली होती. मात्र मुदतीच्या प्रमाणात कामाला सुरुवात देखील झालेली नाही.त्यामुळे अधिकारी ही डेडलाईन तरी पाळणार आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

डांबरीकरण उखडले,नालीच्या कामाचा सुमार दर्जा

स्टेशन रस्त्याच्या कामाला साडेपाच कोटी रुपये मंजूर आहेत. यात 1100 मीटर काँक्रीट रस्ता, 1 किलोमीटर डांबरीकरण आणि 800 मीटर नालीच्या कामाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात शेवटच्या बाजूला डांबरीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षा खराब झाली. या कामाकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. काही नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र पुढे कार्यवाही झाली नाही.उर्वरित नियोजित सिमेंट रस्त्याच्या बाजूला नालीचे काम सुरू आहे. या कामावर पाणी मारले जात नाही,सुमार दर्जाचे काम सुरू असताना अधिकारी डोळेझाक करत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे की अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमताने बोगस काम केले जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

कामाची मुदत संपली, फेरनिविदा काढा

सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 15 महिन्यांची मुदत होती. ही मुदत संपली असून, अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ठेकेदार काम करण्यासाठी सक्षम नाही, असे समजून फेरनिविदा काढावी अशी मागणी केली जात आहे. कामाला सुरुवात करण्यासाठी अजूनही अनेक अडथळे आहेत. त्यासाठी बांधकाम विभागाचा पाठपुरावा नाही. रस्त्यावर विद्युत खांब, डीपी आणि अतिक्रमणे आहेत. हे काढण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी मोजणी आणि महावितरण विभागाकडे पाठपुरावा करताना दिसत नाहीत. त्यामुळे महिनाभराच्या कामाला अजून वर्ष लागणार हे निश्चित.

SendShareTweet
Previous Post

रुग्णालये मृत्यूशय्येवर; मुख्यमंत्री सरसावले, आता आरोग्य यंत्रणेचा कायापालट, 34 जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारण्याच्या सूचना

Next Post

शिराढोण व्यापारी मित्र मंडळ व नाभिक समाजाच्या वतीने जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025
Next Post

शिराढोण व्यापारी मित्र मंडळ व नाभिक समाजाच्या वतीने जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Maratha reservation ..असा ठराव घेणारी महाराष्ट्रातली पहिली नगर पंचायत, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्र्यांसह खासदार-आमदारांना शहरात नो एन्ट्री !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरात सर्वाधिक मतदान,धाराशिवमध्ये निराशाजनक स्थिती, जिल्ह्यात सरासरी 68.97% मतदान

December 3, 2025

शेवटच्या तासात धाराशिवमध्ये ‘या’ मतदान केंद्रावर उसळली गर्दी

December 2, 2025

आठ तासांत ‘इतके’ टक्के मतदान; भूम आणि तुळजापूर आघाडीवर, धाराशिवमधे टक्केवारी घसरली

December 2, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group