• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 5, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिलोत का, पत्रकारांनी स्वतःला विचारून पहावे

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 10, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
164
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पत्रकार नम्रता वागळे यांचा परखड सवाल, कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान कार्यक्रम थाटात

शाम जाधवर / कळंब

तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे महत्वाचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्र झाल्याचा आरोप आपल्या या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर का होतो आहे, आपण खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिलो आहोत का, याचा विचार पत्रकारांनी करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत नम्रता वागळे यांनी मांडले.

कळंब तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडला. कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदाचे 25 वे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अशोकराव मोहेकर तर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, पत्रकार तथा कवी रवींद्र केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या म्हणाल्या, प्रश्न सोडवण्यासाठीचे माध्यम होणे आपल्याला जमले पाहिजे. फक्त टीआरपी वाढवण्याची स्पर्धा सध्या सुरू आहे. मी जे करतोय ते बरोबर आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारु शकणारा व्यक्तीच खरा पत्रकार असतो. एखाद्या घटनेतील फक्त बातमीच आपल्यासाठी महत्त्वाची असते त्याचा भावनिक विचार करून किंवा स्वतः भावनिक होऊन चालत नाही,आपल्या मातीतील, ग्रामीण माणसातील बातम्या करण्याचे सौभाग्य तुम्हा ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळाले आहे, ते भाग्य आम्हा इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये मुंबई – पुण्याला काम करणाऱ्यांना नाही.पत्रकाराला एखाद्या बातमीतील दोन्ही बाजू मांडण्याचे काम करता आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.


प्रतिकूल परिस्थितीत काम करणारा व्यक्ती पत्रकार असतो. मराठवाड्यातील नागरिकांना आपण ग्रामीण भागातील आहोत,याचा न्यूनगंड असतो. परंतु हेच ग्रामीण भागातील व्यक्ती प्रतिभावान असतात. त्यामुळे मागासलेपणाचा न्यूनगंड बाळगू नये, आपल्या बोली भाषेला जातीची नाही तर मातीची नाळ जोडलेली असते. असे मत अभय देशपांडे यांनी मांडले.

नैतिक भीतीची जागा दहशतीने घेतली आहे का , याचा विचार करावा लागेल, पत्रकारितेची दुकानदारी करणारे पत्रकारही तयार झालेले आहेत. त्यात सुधारणा करावी लागेल, आपल्या लेखनाची नैतिक भीती वाटली पाहिजे असे पत्रकार घडणे आवश्यक आहे. आपला वैरी आपल्यातच आहे, तो वैरी शोधण्यासाठी दर्पण दिन असतो. समाजाचा एक्सरे आपण काढतो, आपला एक्सरे काढण्याची वेळ आलेली आहे. असे मत पत्रकार तथा साहित्यिक रवी केसकर यांनी मांडले.सत्ताधारी खासदाराच्या विरोधात बातमी लावली म्हणून आजकाल एखादे चॅनेल बंद केले जाते हे खेदजनक आहे, असे मत पुरस्कार प्राप्त पत्रकार मुस्तान मिर्झा यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जगदीश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन विश्वस्त सतीश टोणगे यांनी केले.
कार्यक्रमाला कळंब शहरातील नागरिक, तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
या सोहळ्यात आफताब शेख (सोलापूर), अतुल कुलकर्णी (बीड), गणेश शिंदे (धाराशिव), निलेश मोहिते (बीड), बालाजी अडसूळ (कळंब), गिरीष जव्हेरी (धाराशिव), मुस्तानभाई मिर्झा (कळंब), अब्दुल माजीद काझी (कळंब) यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
दैनिक देशभक्त आणि दैनिक पुढारी च्या विशेषांकाचे प्रकाशन, तसेच अश्रुबा कोठावळे यांच्या “बालमानांतील शब्द पेरणी” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार व नागरिकांनी याचा लाभ घेतला.

पत्रकार बालाजी अडसूळ भावूक

कै.गणेश घोगरे या नावाने दिला जाणारा पुरस्कार बालाजी अडसूळ यांना दिला त्यावेळी ते भावुक झालेले दिसले. कै. गणेश घोगरे आणि बालाजी अडसूळ यांनी एकाच वेळी पत्रकारिता सुरु केली होती. काळाच्या ओघात मित्र गेला, हयात नसलेल्या मित्राच्याच नावाचा पुरस्कार त्यांच्या या मित्राला मिळाला असे भावपूर्ण मत त्यांनी मांडले.


सेवा समितीचेही पुरस्कार प्रदान


सेवा समिती कळंब मार्फतही पुरस्कार प्रदान
गेल्या १४ वर्षांपासून सेवा समिती कळंब मार्फत पत्रकारांचा आदर्श दर्पण सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यामध्ये आजपर्यंत जवळपास ३८ पत्रकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. यावर्षीचे पुरस्कार सेवा समिती कळंब चे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी जाहीर केले होते. त्यात अमर चोंदे (तालुका प्रतिनिधी, दैनिक समय सारथी), आश्रुबा कोठावळे (तालुका प्रतिनिधी, दैनिक अक्षराज), आकिब पटेल (संपादक महाराष्ट्र प्राईम न्यूज) यांना हे पुरस्कार देण्यात आले. संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

उद्या वेळा अमावस्या, लगबग सुरू, शेतात सजणार हिरवाईचा अपूर्व सोहळा, बाजारात भाज्यांची रेलचेल

Next Post

दिव्यांची आरास अन् फुलांच्या माळांनी सजला परिसर; गीत रामायण नृत्याविष्काराने धाराशिवकर भारावले, कार्यक्रमाला अलोट गर्दी

Related Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025

एसआयटीच्या तपासासाठी नगर पालिकेकडे अभिलेखे उपलब्ध नाहीत, सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत लेखा परीक्षण करा

January 24, 2025

लोकसहभागातून वडगावमध्ये साकारतोय भव्य सिद्धेश्वर देवराई प्रकल्प; 300 जातींच्या 10 हजार झाडांची लागवड

September 28, 2024

हद्द झाली..धाराशिव नगर पालिकेतून आता ट्रॅक्टरची चोरी

September 20, 2024

Arambh Marathi Impact सहाच महिन्यात फलक कोलमडले; ‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाची कंत्राटदाराला नोटीस,दुरुस्तीच्या सूचना

November 1, 2024

प्रथमच 16 फूट उंच भव्य मूर्तीची मिरवणूक; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या भरगच्च कार्यक्रम, आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन

May 13, 2024
Next Post

दिव्यांची आरास अन् फुलांच्या माळांनी सजला परिसर; गीत रामायण नृत्याविष्काराने धाराशिवकर भारावले, कार्यक्रमाला अलोट गर्दी

मांडव्याच्या सरपंच डॉ.योगिनी देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर; मनमानी कारभार करत असल्याचा विरोधकांचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

मे महिन्यात तुफान अवकाळी बरसला, मात्र जूनमध्ये निराशा केली.. आता जुलै महिन्यात काय आहे पावसाचा अंदाज..?

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group