• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 5, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पावसाचा खंड, आता शेतकऱ्यांना अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा, समितीकडून संयुक्त मोजणी सुरू, तीन दिवसात देणार अहवाल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 23, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात महसूल,कृषी विभाग आणि विमा कंपनी करणार पाहणी


सचिन दराडे / तेरखेडा


प्रधान मंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होतात आणि प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाची निर्माण झाल्यास पीक विमा कंपनीकडून या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते.जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून अग्रीम दिली जावी यासाठी महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या संयुक्त पथकामार्फत पाहणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिल्या असून, त्यानुषंगाने पाहणी सुरू झाली आहे.


मागील महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यातील बऱ्याच मंडळामध्ये सरासरीपेक्षा अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशा आता फक्त पिक विमा कंपनीकडे लागली आहे. झालेल्या जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तालुका कृषी प्रमुख यांना प्राप्त झालेल्या सूचनानुसार आपल्या तालुक्यामध्ये एकूण प्रत्येक मंडळात पावसाचा खंड पडल्यामुळे एकूण उंबरठा उत्पन्नातील घट आणि तफावत याचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये समिती गठीत करण्यात आल्या आहेत.या समित्यांनी 3 दिवसात आपल्या मंडळातील पाच टक्के क्षेत्राचा रँडम सर्वे करून तो अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आलेल आहेत.
या समितीमध्ये तालुका कृषी अधीक्षक मंडळ कृषी अधीक्षक पिक विमा कंपनी प्रतिनिधी संबंधित भागातील कृषी सहाय्यक यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित समितीला तीन दिवसात सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे पाहणी सर्व्हे सुरू झाला असून, लवकरच विमा कंपनी कडून तसेच सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

कशी मिळेल मदत ?

जिल्ह्यात महिन्यापासून पावसाने ओढ दिली असून, त्यामुळे खरिपातील पिके वाया जात आहेत. माळरानावर पिकांनी माना टाकल्या आहेत तर काही ठिकाणी शेतकरी स्प्रिंक्लर लावून पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर किमान 50 टक्के पीक वाया गेल्याचे निष्पन्न झाल्यास विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम म्हणून पीक विमा कंपनीकडून 25 टक्के रक्कम तातडीने दिली जाऊ शकते. त्यासाठी पाहणी अहवाल महत्वाचा आहे.

SendShareTweet
Previous Post

महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग; पाणी जपून वापरा,प्रकल्पातील साठ्याचे नियोजन करा

Next Post

स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम, गिरीश धोंगडे याचा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

Related Posts

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025
Next Post

स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम, गिरीश धोंगडे याचा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

विम्याचे निकष शेतकऱ्यांच्या अडचणीचे, कंपनी होतेय मालामाल, शेतकरी कंगाल; कंपनीधार्जिण निकष बदला, आमदार कैलास पाटील यांचे अभ्यासपूर्ण आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मोबाईलवर गेम खेळू नको म्हणताच 16 वर्षीय मुलीने घेतला गळफास

July 3, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

मे महिन्यात तुफान अवकाळी बरसला, मात्र जूनमध्ये निराशा केली.. आता जुलै महिन्यात काय आहे पावसाचा अंदाज..?

July 3, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group