• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, June 25, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शेतकऱ्यांच्या संकटात भर, जिल्ह्यात 10 ते 12 बिबट्यांचे वास्तव्य, वन विभागाचा दावा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 23, 2025
in Arambh Marathi Special
0
0
SHARES
795
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

नवे संकट, दोन वर्षात संख्या 30 वर जाणार,

सज्जन यादव / आरंभ मराठी

धाराशिव –

धाराशिव जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून वाघाने थैमान घातले असताना दुसरीकडे बिबट्याची दहशत देखील वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून बिबट्या हा प्राणी धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात दृष्टीस पडत असून, सध्या धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात १० ते १२ बिबट्यांचा अधिवास असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातील चार बिबटे सध्या वाघाचे अस्तित्व असलेल्या रामलिंग अभयारण्यात आहेत. बिबट्याने अजून मानवावर हल्ला केला नसला तरी भविष्यात बिबट्या आणि मानव हा संघर्ष उभा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच बिबट्याशी जुळवून घ्यावे लागेल असे वनविभागाचे म्हणणे आहे.

मुबलक ऊस, रानडुकरांचा मोठ्या प्रमाणावर असणारा आढळ आणि अधिवासाला अनुकूल वातावरण, यामुळे धाराशिव जिल्ह्यातील काही भागात मागील तीन वर्षांपासून बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वाघ आढळल्यामुळे तो कौतुकाचा विषय झाला आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून वाघाला पकडण्याचे प्रयत्न रेस्क्यू टीमकडून केले जात आहेत. तर दुसरीकडे बिबट्यांची देखील दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या वाघ ज्या रामलिंग अभयारण्यात आहे त्याच अभयारण्यात चार बिबट्यांचे देखील वास्तव्य असल्याचे वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे. म्हणजे २१०० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या रामलिंग अभयारण्यात सध्या एक वाघ आणि चार बिबटे असे पाच हिंस्र प्राणी वास्तव्यास आहेत.

बिबट्या हा भित्रा असल्यामुळे वाघ आणि बिबट्या यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता कमी असली तरी अभयारण्याच्या आजूबाजूला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पशूंना मात्र बिबट्याची भीती आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब, वाशी, भूम, परंडा या सहा तालुक्यात मागील तीन वर्षांपासून बिबट्याचा अधिवास दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या गाय, बैल, रेडकू, शेळी अशा पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ले केल्याचे प्रकार मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. रामलिंग अभयारण्य सोडून इतर भागात ६ ते ८ बिबट्यांचा अधिवास आपल्या जिल्ह्यात असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यामध्ये भूम आणि परंडा या तालुक्यात बिबटे जास्त असण्याची शक्यता आहे. बिबट्याची ही संख्या पुढील काळात वाढत जाणार असल्यामुळे माणसानेच आता बिबट्याशी जुळवून घ्यायची मानसिकता ठेवावी असेही वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील महिन्यात वैराग परिसरात बिबट्याची दोन पिल्ले एका शेतकऱ्याला दिसून आली होती. म्हणजे बिबट्याचे या भागात प्रजनन सुरू असून, पुढील काळात बिबट्यांची संख्या वाढू शकते. या बिबट्यांना पकडणे अथवा त्यांचे प्रजनन रोखणे हा राज्य स्तरावरील विषय असून जिल्ह्यातील वनविभागाच्या हातात या गोष्टी नाहीत.

परिस्थितीशी जुळवून घेण्याची बिबट्यात कला –

बिबट्या हा प्राणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. बिबट्यांचे वास्तव्य जंगलाबरोबरच जंगल परिसरातील गावांच्या आसपास, तसेच बागायती, ऊस क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर दिसते. बिबट्या माणसांच्या वस्तीच्या आजूबाजूला बिनधास्त वावरतात. बिबट्या हा चोरटा शिकारी आहे. जंगलात हा हरीण, माकड, वानर, छोटी रानडुकरे, साळिंदर, ससा अशी शिकार करतो.

जंगलाबाहेर शेळी, मेंढी, छोटे रेडकू, कोंबड्या, मोर यांची शिकार करतात. मनुष्यवस्तीजवळील भटकी कुत्री, डुक्कर ही त्याची सर्वांत आवडती शिकार आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीत बेडूक, उंदीर, घुशी, खेकडा खाऊन तो आपली भूक भागवतो. बिबट्या झाडावर सहज चढतो. त्यामुळे बिबट्याचे वास्तव्य शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे.

ऊसातली शिकार संपल्यास मानवी वस्तीत घुसू शकतो बिबट्या –

सध्या जिल्ह्यातील ऊसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच नवीन ऊस लागण वाढल्यामुळे बिबट्याला लपण्यास भरपूर जागा आहे. सध्या धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रानडुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्यांना सध्या मुबलक शिकार उपलब्ध आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढू लागला. ऊसातील रानडुकरे संपली तर हेच बिबटे खाद्याच्या शोधात पाळीव कुत्री, पाळीव प्राणी यांच्यावर होणारे हल्ले करतील. त्यामुळे वनविभागाने अगोदरच बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

मानव अन् बिबट्या संघर्ष अटळ –

धाराशिव जिल्ह्यात बिबट्याने मानवावर हल्ला केल्याची घटना अजून समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष समोर आलेला नाही. परंतु माणसावर बिबट्याने हल्ला केल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण, माणसाच्या रक्तात क्षाराचे प्रमाण जास्त असते. असे रक्त बिबट्याला जास्त आवडते असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे मानवाच्या रक्ताची चटक बिबट्यांना लागली तर मानवावरील बिबट्याचे हल्ले वाढू शकतात.

पुढच्या दोन वर्षात २५ ते ३० बिबट्यांची भीती –

बिबट्याचा प्रजनन काळ मोठा आहे. दीड ते दोन वर्षाला मादी दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. जिल्ह्यात सध्या दहा ते बारा बिबटे आहेत. यामध्ये किती नर आणि किती मादी याची माहिती वनविभागाला नाही. तरीही यामध्ये पाच मादी जरी गृहीत धरल्या तरी पुढच्या दोन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील बिबट्यांची संख्या २५ ते ३० होऊ शकते.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#leopard#farmer
SendShareTweet
Previous Post

अबब..तीन महिन्यात पावणेदोन कोटींचा दंड: 24 हजार वाहनांवर कारवाया

Next Post

वाघ पाहिला का कुणी वाघ..?

Related Posts

भूर्दंड वाढला: धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ओपीडी शुल्क दुप्पट, उद्यापासून रक्त,सोनोग्राफीसह सर्व तपासणी शुल्कात वाढ

May 6, 2025

ऊर्जा मावळली: पेमेंट केलेल्या 17 हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळेना

March 21, 2025

धाराशिव जिल्ह्यातील बारापैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद

March 12, 2025

अनुदान कधी मिळणार?

February 16, 2025

धाराशिव जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यामध्ये २३ लाख टन ऊसाचे गाळप

February 13, 2025

धाराशिव जिल्ह्यातील चार लाख लाभार्थी महिलांपैकी फक्त दहा लाडक्या बहिणींनी लाभ सोडला

February 11, 2025
Next Post

वाघ पाहिला का कुणी वाघ..?

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ किर्ती किरण पुजार आता धाराशिवचे जिल्हाधिकारी

ताज्या घडामोडी

कारच्या धडकेत नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

June 25, 2025

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीत पुन्हा राडा; बाधित शेतकऱ्याने घेतले विष

June 25, 2025

जबरदस्तीने भूसंपादनः शेतकऱ्यांनी रोखली शक्तीपीठ महामार्गासाठीची संयुक्त मोजणी

June 25, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group