• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, December 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

चिंताजनक स्थिती; राज्यात मुले चोरीचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 13, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
100
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / मुंबई

महाराष्ट्रात लहान मुलं पळवली जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून गेल्या तीन वर्षांत हे प्रमाण तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचा दावा करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिले आहे. हा प्रश्न केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून राज्याच्या सामाजिक सुरक्षिततेला लागलेला खोल घाव असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला देत राज ठाकरे यांनी २०२१ ते २०२४ या कालावधीत मुलं बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे नमूद केले आहे. लहान मुलांना पळवून नेऊन त्यांना कामाला जुंपणे, भीक मागायला लावणे अशा प्रकारच्या आंतरराज्य टोळ्या राज्यात सर्रासपणे कार्यरत असल्याचे स्पष्ट करत सरकार नेमकी कोणती ठोस कारवाई करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ अमुक केसेस दाखल झाल्या आणि त्यातील इतकी टक्के मुलं सापडली अशी कोरडी उत्तरे महाराष्ट्राला नकोत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले आहे.

पोलिसांकडे प्रत्यक्षात किती पालक तक्रारी नोंदवतात, त्यापैकी किती तक्रारी यंत्रणांपर्यंत पोहोचतात, याबाबत शंका उपस्थित करत मुलं सापडली तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक आघाताचं काय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुळात अशा टोळ्या कार्यरतच कशा राहतात आणि इतक्या राजरोसपणे कशा काम करतात, याचा उलगडा सरकारला करता येत नाही का, असा थेट सवालही त्यांनी केला आहे.

आज रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर, बसस्थानकांवर भीक मागणारी लहान मुलं नेमकी कोणाची आहेत, त्यांच्या सोबतची माणसं खरंच आई-वडील आहेत का, याचा तपास करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे आहे का, असा प्रश्न उपस्थित करत गरज पडल्यास डीएनए चाचण्यांचे आदेश देण्याची हिंमत सरकार दाखवणार का, असा सवालही पत्रात करण्यात आला आहे.

लहान मुलं, तरुण मुली पळवल्या जात असताना यावर विधिमंडळात गांभीर्याने चर्चा होणार नसेल तर अधिवेशनाचं नेमकं प्रयोजन काय, असा सवाल उपस्थित करत हिवाळी अधिवेशन म्हणजे केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय बनली आहे का, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. अनेकदा सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती असते, अशा परिस्थितीत या विषयांवर चर्चा होईल अशी अपेक्षा करणेही अवाजवी वाटते, असे त्यांनी नमूद केले आहे.

हा प्रश्न केवळ राज्यापुरता मर्यादित नसून केंद्र सरकारने सर्व राज्यांशी चर्चा करून ठोस कृतिगट तयार करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करत वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत नसल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#condition#child#theft#percent#state#rajthackeray#chiefminister#devendrafadnavis#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत बनावट एक्झिट पोल प्रसारित केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०१ गीर गाईंची भेट

Related Posts

बोगस डॉक्टरची तोतयेगिरी उघड; चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाच्या जीवितास धोका, डॉक्टरवर गुन्हा दाखल

December 18, 2025

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडितेच्या भावाला बेदम मारहाण

December 18, 2025

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील पाच ठिकाणचे आठवडी बाजार 21 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शालेय विद्यार्थ्यांच्या टॅम्पोचा भीषण अपघात; ३५ विद्यार्थी जखमी

December 18, 2025

तुळजापूरमधील कुलदीप मगर हल्ला प्रकरणातील आणखी पाच आरोपींना अटक

December 18, 2025

मुरुम येथे SBI बँकेत RBI नियमांची पायमल्ली?

December 18, 2025
Next Post

धाराशिव जिल्ह्यातील 'या' शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०१ गीर गाईंची भेट

अखेर 'या' साप्ताहिक रेल्वेला धाराशिवला मिळाला थांबा, भाविकांची झाली सोय

ताज्या घडामोडी

बोगस डॉक्टरची तोतयेगिरी उघड; चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाच्या जीवितास धोका, डॉक्टरवर गुन्हा दाखल

December 18, 2025

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडितेच्या भावाला बेदम मारहाण

December 18, 2025

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील पाच ठिकाणचे आठवडी बाजार 21 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group