• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, July 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अनुदान कधी मिळणार?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 16, 2025
in Arambh Marathi Special
0
0
SHARES
315
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

अतिवृष्टी अनुदान मंजूर होऊन दोन महिने झाले तरी वितरण रखडले

पाच तालुक्यातील दीड लाख शेतकरी प्रतीक्षेत

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीच्या अनुदानापोटी २२१ कोटी ८१ लाख रुपये निधी वितरणास राज्य शासनाने १० डिसेंबर रोजी मान्यता दिली होती. परंतु दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना अनुदानाचे हे पैसे वितरित झालेले नाहीत. आतापर्यंत केवळ ४२ हजार शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणखी दीड लाख शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासकीय नियमाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने ८ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाला जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव पाठवला होता.

त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण बाधित १ लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रासाठी २२१ कोटी ८१ लाख रुपयांची मागणी केली होती. राज्य शासनाने त्याला १० डिसेंबर रोजी मान्यता दिली. त्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्याचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला होता.

परंतु दोन महिने होऊन गेले तरी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळण्याची प्रक्रिया संथ असल्याचे दिसते. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांना ४५ कोटी ११ लाख आणि कळंब तालुक्यातील १२ हजार ९९१ शेतकऱ्यांना १४ कोटी ४७ लाख एवढ्याच अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार २१८ शेतकऱ्यांना १६० कोटी रुपये मिळण्यास दिरंगाई होत आहे. विशेष म्हणजे अनुदान वाटपास का उशीर होतोय याचे उत्तर प्रशासनाकडे देखील नाही. अनुदान मंजूर झालेल्या पाच तालुक्यांपैकी केवळ धाराशिव आणि कळंब तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. तर लोहारा, परंडा आणि वाशी या तीन तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला अनुदानाची रक्कम मिळाली नाही.

जिल्हा प्रशासनाने ८ ऑक्टोबर रोजी पहिला प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यात धाराशिव, कळंब, वाशी व परंडा या चारच तालुक्याचा समावेश होता. त्यासाठी निधी मंजूर करून दोन महिने होऊन गेले. परंतु, अद्याप शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू शकले नाही. रब्बी हंगाम संपत आला तरी खरीप हंगामातील नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकलेले नाहीत.

लोहारा – उमरगा तालुक्यांचा प्रस्ताव आणखी मंजूरच नाही

सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली होती. तरीही प्रशासनाने फक्त धाराशिव, कळंब, वाशी आणि कळंब या चारच तालुक्यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या मागणीनुसार प्रशासनाने दुसरा प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार लोहारा व उमरगा तालुक्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांना ८६ कोटी ४६ लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव १५ ऑक्टोबर रोजी शासनाकडे पाठवलेला आहे. परंतु त्या प्रस्तावावर आणखी काहीच निर्णय न झाल्याने दोन तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

तालुका – पात्र शेतकरी – केवायसी केलेले शेतकरी – अनुदान मिळालेले शेतकरी

१) धाराशिव – ६५६३३ – ६०५७३ – २९५७७

२) लोहारा – ३७० – ३१४ – ००

३) परंडा – १४३९५ – १२५१५ – ००

४) कळंब – ६५३३१ – ५९२०८ – १२९९१

५) वाशी – ३५०५७ – ३१०२५ – ००

एकूण १ लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांपैकी १ लाख ६३ हजार ६३५ शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घेतली आहे. त्यापैकी फक्त ४२ हजार ५६८ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे.

एकूण बाधित क्षेत्र – १ लाख ६३ हजार ९७ हेक्टर

एकूण शेतकरी – १ लाख ८० हजार ७८६

एकूण अनुदान रक्कम – २२१ कोटी ८१ लाख

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #osmanabad#dharashiv#farmer#maharashtra
SendShareTweet
Previous Post

रेस्क्यू टीम पुन्हा नेम धरणार.. सोमवारपासून वाघाची शोध मोहीम सुरु होणार

Next Post

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

Related Posts

गनिमी कावा, रस्ता अडवलेली वाहने रातोरात पोहोचली झेडपीच्या गेटवर,त्यावर लिहिले..

गनिमी कावा, रस्ता अडवलेली वाहने रातोरात पोहोचली झेडपीच्या गेटवर,त्यावर लिहिले..

July 13, 2026
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026

आलूर मतदान केंद्रावर पत्रकारांना दमदाटी; पीएसआय संदीप दहिफळे यांचा जाहीर निषेध

February 7, 2026

शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; धाराशिवच्या ‘या’ पतसंस्थेने केली पहिली मदत, मुख्यमंत्री सहायता निधींचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार

September 24, 2025

बाप्पा, विकासाच्या मारेकऱ्यांना सद्बुद्धी दे, तुझ्या उत्सवातली वेदना आम्हालाही सहन होत नाही..

August 27, 2025

प्रवीण गुरुजी, निकले फर्जी..?, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींवर ॲड. शीतल चव्हाण यांचा हल्लाबोल, थिल्लरपणा बंद करा!

July 27, 2025
Next Post

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 'या' तारखेला मिळणार

खरीप 2022 च्या नुकसानीचे आणखी 600 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार

ताज्या घडामोडी

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

July 14, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

July 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group