• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, January 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मराठ्यांना फसवले तेच ब्राह्मण समाजाबाबत घडतंय का..? राजकीय साठमारीत मराठे संभ्रमात, ब्राह्मण समाजात फडणवीसांबद्दल सुप्त नाराजी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 1, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
814
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी विशेष

मराठा समाज अलिकडच्या काळात जेवढा अशांत दिसतो आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अस्वस्थ आणि आत्यंतिक संभ्रमित आहे. किंबहुना तो गोंधळून गेला आहे. याचे सामाजिक आणि राजकीय असे दूरगामी परिणाम होणार हे कोणीही नाकारू शकणार नाही. मुळात गरीब मराठा समाज आणि स्वजातीय सगे-सोयरे शैक्षणिक तसेच अन्य सुविधांपासून वंचित राहत होते, त्यामुळे सामाजिक पातळीवरून आरक्षणाचा आग्रह रेटून धरण्यात येत होता. १९८० पासून विविध पद्धतीने या विषयाचा पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र हा मुद्दा काही धसास लागत नाही, याविषयीची प्रचंड सल मराठा समाजातील प्रत्येकाच्या मनात खदखदत आहे. दुसरीकडे ब्राम्हण समाजातही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुप्त नाराजी आहे.

आपलेच नेते आपल्याच समाजाला न्याय देत नाहीत हे मराठा समाजाला पुरते कळून चुकले, मात्र आपल्या जाणत्या नेत्यांना जाब विचारण्यासाठी हिंमत त्यांनी कधी एकवटली नाही. तरीही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याच्या हेतूने मुलभूत प्रयत्न केले, त्यास ब-यापैकी यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाच विषय आणखी एक पाऊल पुढे नेला. आता मराठा आरक्षणाचे गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रशासनाने मनोज जरांगे यांना विश्वासात घेऊन कार्यवाही केली. तरीही सद्या मराठा असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जात असलेले मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, तसे ते अजूनही आहेत.

आता आरक्षणाच्या मागणीवरून अधीर झालेला सामान्य मराठा समाज आत्यंतिक गोंधळात सापडला आहे.

आपल्याला न्याय कोण देईल? असा प्रश्न सकल मराठा समाजाला पडला असेल तर त्यात गैर काय? कारण, हाता-तोंडाशी आलेले आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरलेल्या ‘मविआ’ राज्यकर्त्यांविषयी असलेली संतप्त भावना, आपल्याला सतत फसवले जात आहे या भावनेतून उफाळत असलेला उद्वेग, समाजातील तरूणांमध्ये वाढत चाललेले वैफल्य, काबाडकष्ट करूनही शेतमालाला न मिळणारे पुरेसे दर, अत्यल्प गुणांनी हुकत असलेली शिक्षण आणि नोकरीतील संधी, महागाईमुळे मेटाकुटीला आलेला चरितार्थ अशा अनेकविध बाबींची जंत्री दररोज त्यांना छळत असते. अर्थातच अन्य धर्मातील, समाजातील लोक या सा-यांना अपवाद आहेत असे मुळीच नाही. मात्र अशा सा-या अनुषंगिक बाबींचा कोणी राज्यकर्ते एकूणच सामाजिक, आर्थिक उत्थानाच्या दृष्टीकोनातून गांभीर्याने विचार करतील का? करदात्यांच्या पैशातून मलमपट्टी करणे सोपे असले तरी राज्यातील तमाम जनसामान्यांची भ्रांत मिटेल या दृष्टीने काही ठोस उपाय योजना सरकारी पातळीवरून केली जाईल का? हा मुलभूत प्रश्न आहे. कारण सामान्य जनता सरकार आणि प्रशासनाकडूनच अपेक्षा बाळगणार, नाही का?

आज एकीकडे देवेंद्र फडणवीसांविषयी समस्त ब्राह्मण समाजात सुप्त नाराजी आहे. त्यांनी ब्राह्मण समाजातील गरीब, आर्थिक मागास घटकांसाठी ठोस काही भूमिका घेतलेली नाही, किंबहुना या समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळेल, असे काही निर्णय अंमलात आणलेले नाहीत, तरीही हा वर्ग अजूनही संयम बाळगून आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुस-या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी सतत नेटाने प्रयत्न करूनही या समाजातील एका समूहाला त्यांच्याविषयी काहीही आस्था वाटत नाही, उलटपक्षी असंसदीय, अर्वाच्च, शेलक्या टीकेचे ते धनी ठरले. या पाठोपाठ आता मराठा तरूणांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह मराठा नेत्यांवर देखील सोशल मिडीयावर आगपाखड सुरू केली आहे. अर्थातच याच नेत्यांनी घेतलेली भूमिका त्यास कारणीभूत आहे, हे कसे नाकारता येईल. मराठा समाजातील उद्वेग रस्त्यावर आलेला असतानाही ते मौन बाळगून होते, ते का? मात्र जेव्हा महायुती सरकारने SIT चौकशीचा पवित्रा घेतला आणि मनोज जरांगे यांनी राजकीय नेत्यांची पण चौकशी करा असा मुद्दा रेटला; तेव्हा सुप्रिया सुळे, शरद पवार, राजेश टोपे सारे बोलते झाले. त्यांनी कदाचित हे मौन आधी सोडले असते तर संयमाने प्रश्न सुटला असता. अनेक गरीब घरातील तरुणांवर गुन्हे दाखल झाले नसते, आणि कोणाची घरे पेटली नसती. महायुती सरकारने काही गुन्हे माफ केले, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणावी.

मुळात आज खरी गरज राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला गोंधळ मिटविण्याची आणि दोन्ही बाजूची दुखावलेली मने सांधण्याची आहे. म्हणूनच संतप्त मराठा तरूणाईचे समुपदेशन करण्यास मराठा समाजातील बड्या-जाणत्या नेत्यांनी आता तरी पुढाकार घेतला पाहिजे, ही काळाची गरज आहे.

श्रीपाद सबनीस
मुख्य संपादक, khabarbat.com

SendShareTweet
Previous Post

आत्महत्येस प्रवृत्त केले; युवा सेनेचा जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे याच्यावर गुन्हा दाखल; बांधकामाचे पैसे न देता राहुल किरदत्त या तरुणाचा केला जात होता छळ

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस धाराशिव दौऱ्यावर; गुरुवार, शुक्रवारी जिल्ह्यात चार सभा, आठही तालुक्यात दौरा

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस धाराशिव दौऱ्यावर; गुरुवार, शुक्रवारी जिल्ह्यात चार सभा, आठही तालुक्यात दौरा

शिवसेनेबद्दलही मराठ्यांना संशय, म्हणून हाकेंना हाकला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव तालुक्यात बंडखोरी वाढण्याची शक्यता, दुसऱ्या दिवशी ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार

January 24, 2026

धाराशिव नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध; ‘हे’ सदस्य झाले विषय समित्यांचे अध्यक्ष

January 24, 2026

आता ग्रामपंचायतीवर प्रशासकराज; ४२८ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू

January 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group