• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्ह्यातील बारापैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 12, 2025
in Arambh Marathi Special
0
0
SHARES
603
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जिल्ह्यात १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

गुळपिठी करखान्यांकडून ३० टक्के ऊसाचे गाळप

सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी

धाराशिव जिल्ह्यात यावर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला होता. हा हंगाम आता संपल्यात जमा असून जिल्ह्यातील बारा पैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद झाली असून उर्वरित ३ साखर कारखाने लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील ५ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांनी यंदा १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

चालू गळीत हंगामात ३ मार्च २०२५ च्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यात २८ लाख १७ हजार ३६५ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून १९ लाख १६ हजार ९७६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखरेचा सरासरी उतारा केवळ ६.८ टक्के आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १२ पैकी ९ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

यामध्ये तेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब बिराजदार, नॅचरल शुगर, धाराशिव, भैरवनाथ सोनारी, कंचेश्वर, लोकमंगल, बाणगंगा या कारखान्यांचा समावेश आहे. उर्वरित ३ साखर कारखाने लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. ५ सहकारी कारखान्यांनी ११ लाख ५१ हजार ६७९ टन उसाचे गाळप करत ७ लाख ३० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सहकारी कारखान्यांचा साखर उतारा ६.३४ टक्के आहे. ७ खासगी कारखान्यांनी १६ लाख ६५ हजार ६८५ टन उसाचे गाळप करून ११ लाख ८६ हजार २७६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून साखर उतारा ७.१२ टक्के आहे. नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रीज रांजणी या कारखान्याने ४,७१,२१४ टन ऊस गाळपातून ४,३७,७५० क्विंटल साखरेचे उत्पादन काढले. या शुगर इंडस्ट्रीजचा साखर उतारा ९.४१ आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त ११.१६ साखर उतारा असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील कंचेश्वर शुगरने २,५०,५३७ टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून २,८०८५५ क्विंटल साखर उत्पादन केली.

भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने १,२४,२४१ टन ऊस गाळप करून, ८४,२०० क्विंटल साखर उत्पादन केली आहे. मुरूम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याने २.२०,१९० टन ऊस गाळप करून २,२१,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तर केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना कारखान्याने २,०५,०२८ टन ऊस गाळप करून १,८२,४०० क्विंटल साखर उत्पादन काढले.

भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याने १,४४०३५ टन ऊसाचे गाळप करून १,२९,९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तर लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील क्विनर्जी इंडस्ट्रीज भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने ४,५८,१८५ टन ऊसाचे गाळप करून १,१२,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल यांनी ८१४६० टन ऊस गाळप केला त्यामधून ७०६४१ क्विंटल साखर तयार झाली.

कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने १,२९,८४७ टन ऊस गाळून त्यातून १,१३,१५० क्विंटल साखर उत्पादीत केली. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने १,३९,६२१ टन ऊसातून ६५६००क्विंटल साखर काढली. लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज खेड तालुका लोहारा या कारखान्याने २,१८,२८६ टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून २,१८,२८० क्विंटल साखर काढली.

सरासरी २७०० रुपये भाव –

यावर्षी सर्वच साखर कारखान्यांनी ऊसाला सरासरी २७०० ते २८०० रुपये प्रति टन भाव दिला. गुळपिठी कारखान्यांनी देखील असाच भाव दिला. यावर्षी भाव देण्याची स्पर्धा झाली नाही तरी गुळपिठी करखान्यांमुळे साखर कारखान्यांना देखील हंगामाच्या सुरुवातीलाच दर जाहीर करावे लागले. यावर्षी एकूण ऊस क्षेत्रापैकी तीन ते पस्तीस टक्के ऊस गुळपिठी कारखान्यांनी गाळप केला.

पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाची समस्या –

पुढच्या वर्षीचा गाळप हंगाम लवकर सुरू होऊन उशीरा संपेल अशी शक्यता आहे. परंतु अतीरिक्त उसाची समस्या शेतकऱ्यांना भेडसावणारी ठरणार आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी अतिरिक्त ऊसाची समस्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरू शकते.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#sugar
SendShareTweet
Previous Post

अजितदादांना सासुरवाडी दिसेना.. कोण करणार धाराशिवचा विकास ?, ना तीर्थक्षेत्रासाठी निधी, ना विकास योजनेचा समावेश

Next Post

Good News खरीप हंगामासाठी 250 कोटींचा पीकविमा मंजूर, पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार

Related Posts

बाप्पा, विकासाच्या मारेकऱ्यांना सद्बुद्धी दे, तुझ्या उत्सवातली वेदना आम्हालाही सहन होत नाही..

August 27, 2025

प्रवीण गुरुजी, निकले फर्जी..?, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींवर ॲड. शीतल चव्हाण यांचा हल्लाबोल, थिल्लरपणा बंद करा!

July 27, 2025

इथे विद्यार्थ्यांनाही भोग भोगावे लागतात, नूतन प्राथमिक शाळाच पाण्यात!, धाराशिवचे प्रशासन झोपलेय का?

July 26, 2025

४० दिवसांत ३३० गायींची सुटका, २५ वाहनांसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

July 16, 2025

भूर्दंड वाढला: धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ओपीडी शुल्क दुप्पट, उद्यापासून रक्त,सोनोग्राफीसह सर्व तपासणी शुल्कात वाढ

May 6, 2025

ऊर्जा मावळली: पेमेंट केलेल्या 17 हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळेना

March 21, 2025
Next Post

Good News खरीप हंगामासाठी 250 कोटींचा पीकविमा मंजूर, पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार

मोठी बातमी; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 4 सरपंचसाह 93 सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

ताज्या घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदतवाढ

September 16, 2025

पालकमंत्री प्रताप सरनाईक आज करणार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

September 16, 2025

मनोज जरांगे पाटील बुधवारी धाराशिव दौऱ्यावर, स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

September 15, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group